marathi blog vishva

बुधवार, २९ डिसेंबर, २०१०

निर्भीड व्हा---२०
गुरू नसतोच !
शरद पवारांचे राजकीय गुरू म्हणतात यशवंतराव चव्हाण हे होते. आता जर कोणी इतिहासकाराने शोधून काढले की कुठल्यातरी संबंधांने यशवंतराव ब्राह्मण होते तर किती पंचाईत येईल. आई जिजाऊ व बाल शिवाजी नांगर हाकताहेत व दादोजी कोंडदेव शेजारी बघताहेत ह्या पुतळ्यातला दादोजींचा पुतळा ते गुरू नव्हतेच म्हणून जसा कापून वेगळा काढला, तसा यशवंतराव व पवारांचा एकत्र पुतळा असेल तिथे पंचाईत होणार. किंवा पवारांना त्यांच्या गुंतवणुकीत जसे अनिरुद्ध देशपांडे चालतात, तसे झाले तर मग दादोजींचा कापलेला पुतळा परत जोडता येतो का ते पहावे लागेल.
पण कोणाला गुरू खरेच असतात का ? असते तर असे का होते की यशवंतरावांनी आयुष्यात कमाई केली अवघी एकदोन लाखाची ( हे परवा पवारांनीच सांगितले म्हणून कळले ! ) व पवारांची ? आता दोघेही भारताचे संरक्षण खाते सांभाळते झाले ह्यावरून त्यांना गुरू-शिष्य मानावे तर असे कसे की यशवंतराव कायम कुंपणावर बसण्याच्या नीतीचे पुरस्कर्ते तर पवार कुंपणानेच शेत खाणारे ? नसावेच ते गुरू पवारांचे !
आपण जर गुरूंकडून खरेच शिकत असतो तर साने गुरूजींचे सगळेच शिष्य कसे मृदू-मुलायम निघते . जे महात्मा गांधी मनोनिग्रहाचे एवढे खंदे पुरस्कर्ते त्यांचाच शिष्योत्तम ( जवाहरलाल नेहरू ) इतका मनस्वी निघावा ! जगाचा इतिहास सांगतो, गुरूंच्या आदेशांची पायमल्ली करणारे व ते धुळीस मिळवणारे हे शिष्यच असतात . अगदी येशू ख्रिस्तापासून हे चालू आहे. शिष्याचा हा विद्रोह पाहिला तर कसला आला आहे गुरू, हे कळतेच !
गुरूच्या असण्या नसण्याच्या पुराव्यासाठी इतिहासाची काही गरजच माणसाला लागत नाही. आता लोकमानसात कायम घर करून राहिलेले हे ऐतिहासिक प्रसंग पहा: कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सोडताना शिवाजी महाराजांनी तिला मातेसमान दर्जा देणे ( इतिहासकार म्हणतात, असा काही प्रसंगच घडला नव्हता ) ; महात्मा गांधींनी गोळी लागून खाली पडताना "हे राम !" म्हणणे ( त्यांचा पीए पुस्तकात म्हणतो की असे ते काही म्हणाले नव्हते !) . पण हा इतिहास कोणत्याही पुराव्याशिवाय लोकमानसात कोरलेला असतो. तो सहजी पुसता येत नाही. असेच दादोजींचे असेल ! ह्यालाच तत्वज्ञानात "जाणवलेले सत्य" ( परसीव्हड रिएलिटी ) म्हणतात. तो सिद्ध किंवा खोडण्याचा प्रयत्न करणे हे निष्फळ होते.
जो शिकवतो तो गुरू, अशी व्याख्या केली तर असे आढळून येईल की आपण कोणाच्या शिकवण्याने नाही तर आपल्या स्वत:च्याच शिकण्याने शिकतो ! दादोजी असण्याची काही गरजच नसते. मग ते ब्राह्मण असोत की मराठा ! ब्राह्मणांचा आद्यपुरुष परशुराम ह्या बाबतीत खरेच आदर्श आहे, असे विनोबा भावे म्हणतात. कारण त्याने लोकवस्ती नव्याने वसवताना वनस्पतीशास्त्राचा अभ्यास ( परशु हे हत्यार निर्माण केले) केला, रामाने वनस्पतीचे अगत्य दाखवून दिल्यावर झाडे तोडणे बंद केले, लोकांना वेद शिकवून त्यांना ब्राह्मण म्हणून घोषित केले, बापाची आज्ञा म्हणून क्षत्रीय आईची हत्या केली, व अंती ह्या सर्वाची परिणती म्हणून समुद्राकडे पहात समुद्रासारखे मर्यादेत रहावे, कुठल्याही टोकाला जावू नये, हा संदेश दिला. आणि हे सर्व तो स्वत:च्या अनुभवातून शिकला ! ( आता कोणी ब्रिगेड, लगेच परशुरामाचे पुतळे शोधायला लागेल ! )
नसलेल्या गुरूंचे असे असंख्य पुतळे नगरपालिकेने रोज जरी कापले तरी काही बिघडत नाही . कारण जनतेच्या लोकमानसात जे गुरू असतात, ते नसताना आरूढ झालेले असतात. तर ते काढण्याने जात नाहीत ! आणि मुळात गुरू नसतोच !

गुरुवार, १६ डिसेंबर, २०१०

निर्भीड व्हा-----१९
दबाव केव्हा येतो ?
दिग्विजय सिंगांचे "करकरे दबावाखाली होते" ह्या म्हणण्यासाठी हटून राहणे, काही तरी वेगळेच सुचवणारे आहे. समजा करकरे मालेगाव स्फोटानिमित्ताने दबावाखाली असतील तर असला दबाव केव्हा व कसा येतो ?
कोणाही मानसोपचारतज्ज्ञाला विचारा, आपल्या मनाविरुद्ध काम करावे लागले तर दबाव येतो असे म्हणतात. नोकरी धंद्यात आपण पाहतो की "जॉब सॅटिसफॅक्शन" हे त्यामुळेच महत्वाचे ठरते. जर रक्त पाहून कोणी बेशुद्ध पडत असेल, व त्याला आईवडिलांनी बळजबरीने डॉक्टरकीला टाकले असेल तर त्याला दबाव येतो. पंतप्रधान झालो तर आपले इटालियनपण सारखे त्रास देणार ह्या दबावापायीच सोनियांना "आतल्या आवाजाला" ओ द्यावी लागली. आता जर आणखी सांगाडे बाहेर आले तर आपली काही खैर नाही ह्या दबावापायीच तर जेपीसी नको आहे. एखाद्या पत्रकाराला कितीही जनमताच्या विरोधी लिहायचे धारिष्टय असते, पण आपण कोणाच्या दबावाखाली आपल्या मनाविरुद्ध काही लिहिले आहे, त्याचा त्याला ज्यास्त दबाव येतो. वीर संघवी व बरखा दत्तला विचारा . आपली जी धारणा असते त्याविरुद्ध वरिष्ठांनी काम करायला सांगितले तर त्याचा दबाव येतो. पोलिसाला जर निरपराध्यावर गोळ्या चालवा असे सांगितले तर तसे करताना त्याचे हात थरथरतात. दबाव येतो. दाऊदची टोळी एरव्ही इतक्या धमक्या देते त्याचे एखाद्याला काही वाटत नाही, पण आपण जर दाऊदच्या शूटरला कधी सोडले असेल तर ते उघडकीला येण्याचे दडपण येते. त्याला सोडताना दबाव येतो. एवढे कशाला, खोटे बोलणे शोधणारे जे मशीन आहे त्याचे सूत्रच आहे की मनाविरुद्ध खोटे बोलणार्‍याचे शरीरच मशीनद्वारे खुणा करते, दबाव दाखवते.
आता दिग्विजय सिंगांकडे फोनचे तपशील नाहीत, गृहमंत्रीसुद्धा तसा फोन झाला नव्हता म्हणतात तरी करकरेंवर दबाव असलाच तर तो वरिष्ठांच्या त्यांच्यामागे लावलेल्या मालेगाव स्फोटात हिंदू आतंकवाद्यांना कसेही करून पकडा ह्या दबावाचेच असणार आहे. एरव्ही रोज गुन्हेगारांना पकडणार्‍याला त्यांच्या धमक्यांचे काय हो ? दबाव असलाच तर तो मनाविरुद्ध कोणाला पकडावे लागले त्याचाच असणार आहे ! दिग्विजय सिंगाच्या सातत्यामुळे हे लक्षात तरी आले. कित्येकवेळा शाहण्यांच्या शोधातून सापडत नाही ते कोणाच्या बरळाने सहजी लख्ख दिसून जाते, ते असे !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

रविवार, १२ डिसेंबर, २०१०

निर्भीड व्हा-----१८
दिग्विजयाचे दिगहरण करा !
अंतुले ह्यांनी लोकसभेत जो तमाशा केला होता तसाच आता मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेसचे महासचीव, श्री.दिग्वीजय सिंग करीत आहेत. त्यांच्या मते ते करकरेंना २६/११ च्या मुंबई हल्ल्याच्या ३ तास अगोदर फोनवर बोलले होते. आणि करकरेंनी त्यांना हिंदुत्ववादी अतिरेक्यांनी धमकी दिली होती असे सांगितले होते. असेच वक्तव्य राजदीप सरदेसाई ह्यांनी सुद्धा २६/११ च्या बातम्या दरम्यान केले होते. ह्या उलट विकीलीक्सच्या गौप्यस्फोटाप्रमाणे अमेरिकन राजदूत त्यांच्या अध्यक्षाला सांगतो की ह्या हल्ल्यात हिंदुत्ववादी अतिरेकी नव्हते, तरीही धर्माचे राजकारण अंतुलेमार्फत कॉंग्रेस सरकार करीत आहे. अमेरिकन राजदूत हे अध्यक्षाला का सांगत आहे ? कारण ह्या हल्ल्यात अमेरिकन नागरीक कामी आलेले आहेत व अमेरिकेत असा कायदा आहे की अमेरिकन नागरीक जिथे कुठे असेल तिथे त्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी अमेरिकन सरकारची आहे. हा काही नुसताच पोकळ कायदा नाही तर त्याची अमलबजावणी अमेरिकन सरकार सार्‍या जगात करते हे मी स्वानुभावाने सांगू शकतो. आम्ही कॅनडाला जाताना आमचा ( भारतीय ) फॉर्म वेगळा व मुली व नातवंडांचा ( ते अमेरिकन नागरीक ) फॉर्म वेगळा भरावा लागला होता. ह्याच पद्धतीमुळे काठमांडूच्या ओलीत धरलेल्या विमानात किती अमेरिकन नागरीक होते ते त्यांना तात्काळ कळले होते. तसेच एका अमेरिकन पत्रकाराचा खून पाकिस्तानात झाला तेव्हा त्यांच्या सरकारने त्याचा शेवटापर्यंत तडा लावला होता.
अमेरिकेच्या राजदूता पुढे अंतुले व दिग्वीजय सिंगांचे म्हणणे कसे खोटे पडणारे आहे हे अजूनही दुसर्‍या उदाहरणाने बघता येईल. हिंदुत्ववादी अतिरेकी इतके जर खतरनाक असते की जे करकरेसारख्याचा परस्पर काटा काढू शकते तर मग त्यांना मिळणारी वागणूक व कसाबला मिळणारी वागणूक ह्यात सरकार फरक का करते आहे. साध्वी प्रज्ञा आजारी पडते तेव्हा तिला जे.जे. सरकारी इस्पितळात कोणालाही पाहता येईल अशा वार्डात ठेवण्यात येते तर कसाबसाठी कित्येक कोटी खर्च करून स्पेशल व्यवस्था करण्यात येते व शिवाय त्याची जातीने गृहमंत्री चौकशीही करतात. बरे हिंदुत्ववादी इतके जर सरकारवर दडपण आणणारे असते तर सुषमा स्वराज ह्यांनी लेखी देऊनसुद्धा थॉमस ह्यांची नेमणूक सरकार करू धजलेच नसते. सरकारात नसल्याने ज्यांचा दबाव येणेच शक्य नाही त्या हिंदुत्ववाद्यांचा पहा किती जोर आहे की त्यांनी करकरेसारख्यांना परस्पर उडवले असे म्हणणे हा केवळ तर्कटाचा दहशतवाद आहे. आणि इतका जर हिंदुत्ववाद्यांचा धाक आहे तर मग अजूनही अफजल गुरूला फाशी का मिळत नाहीय ? आता कोणालाही पटेल की हिंदुत्ववाद्यांचा बागुलबुवा हा विकीलीक्स म्हणते त्याप्रमाणे एक धर्माचा खेळ करणे आहे. आणि हे आपण निर्भीड होत जाणले पाहिजे.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

निर्भीड--
अमर्याद परशुराम !
कोणी तरी टोचले की ज्या समाजाचा आद्य पुरुष परशुराम आहे, त्यांना अहिंसेबद्दल बोलायचा काही अधिकार नाही. परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती, एवढीच मला माहीती होती. त्यामुळे एक अपराधीपण आले. खरे तर आमच्या वडिलांनी ब्राह्मण्याच्या कुठल्याच लौकिक खुणा आम्हाला कधी दाखवल्या नाही. आमच्या कोणाच्या मुंजी झाल्या नाहीत. एका भावाने मराठा मुलीशी लग्न केले, आणि कुठलेच धार्मिक विधी आम्ही कधी केले नाहीत. वडिलांचे वा आईचे श्राद्धही आम्ही केले नाही. तरीही आम्ही ब्राह्मण आहोत असे कोणी म्हणाले तर ते लागतेच. त्यात मला तर ह्या आद्य पुरुषाविषयीही फारशी माहीती नाही. कोण होते परशुराम ?
विनोबा भावेंच्या शब्दात ( विनोबा सारस्वत--सं: राम शेवाळकर, साहित्य अकादेमी प्रकाशन ) हा त्या काळचा सर्वोत्तम पुरुषार्थी माणूस होता. आई क्षत्रीय तर बाप ब्राह्मण. हा भयंकर पितृभक्त होता. बापाच्या आज्ञेने ह्याने आईचे डोकेच उडविले. त्याकाळच्या क्षत्रीयांचा अत्याचार सहन न होऊन ह्याने २१ वेळा युद्ध करून पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती. तरीही क्षत्रीय राहिलेच. मग ह्याने अरण्ये तोडून कोकणात वस्ती केली व लोकांना चांगले विचार, आचार व उच्चार शिकविले व तुम्ही ब्राह्मण झालात असे घोषित केले. परशुराम रामभक्त होता. रामाच्या भेटीच्या वेळी राम झाडाला पाणी घालत होता त्यावरून त्याला झाडे कुर्‍हाडीने तोडण्याऐवजी झाडे लावणे हे महत्वाचे आहे हा बोध झाला व नंतर त्याने वनस्पतीशास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्याने शोधलेल्या अवजाराला "नव परशु" असे म्हणतात व कोकणात जी फळझाडे जोपासलेली आहेत त्याचे कारणही त्याचा हा अभ्यासच असावा. आईचे डोके उडविणारा, पृथ्वी नि:क्षत्रीय करणारा हा परशुराम शेवटी शेवटी आपल्या जीवनाचे सार समुद्रासारखे प्रवृत्तींची मर्यादा हेच आहे असे म्हणतो व केलेल्या हिंसेची उपरती दाखवतो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा भक्त असलेला हा परशुराम शेवटी संदेश देतो की "ॐ नमो भगवत्यै मर्यादायै".
स्खलन झाल्यावर त्यातून शिकणे व सावरणे ह्याला खूपच मोठेपणा लागतो व म्हणूनच ब्राह्मण समाजाने अजूनही परशुरामाला आपले आद्यपुरुष म्हणून मानले असेल. ह्याच न्यायाने परशुरामाला, किंवा ब्राह्मणांना आता अहिंसेबद्दल बोलायला काहीच हरकत नसावी.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Without Fear or Favour
UnLimited Parshuram !
The other day someone teased me on my blog saying that those whose Founder is Parshuram should not talk about Non-Violence. Though the comment unsettled me, it shamed me that I even did not know enough about the Founder of Brahmins ( especially Kokanastha Brahmins) the God Parshuram. Though I know that I am Brahmin, I was not raised amongst Brahministic rituals etc. For example , none of we brothers had a thread ceremony and one of us married a non-brahmin girl. This prompted me to know more about Lord Parshuram. ( I only knew that he had attempted to kill all the Kshatreeyas on the world, 21 times ! )
Vinoba Bhave was a modern day saint more famously known for Bhoodan-Yadnya, a campaigne inviting people to donate excess farm land to the farmless and thus attempt socialism in practice. He has described Lord Parshuram in book "Vinoba Saraswat--edited by Ram Shevalkar and published by Sahitya Academy".: His mother was Kshatriya and father was a Brahmin. He was a devotee of his father and adored him so much that when he ordered him to kill his mother he beheaded her. No doubt, he was so violent. He also was a rebel and detested wrongdoings of then Kshatriya rulers. So he vowed to anihilate all Kshatriyas from the earth and led 21 campaignes to kill all of them. Later he became devotee of Lord Raam, who is epitome of Self-Control. After defeating Kshatriyas, he wanted to create a special colony of people in Konkan , which was a jungle then. With his famous weapon, the Axe, he deforested konkan extensively and rehabilitated the victims there. He taught them good values and the scriptures and declared all these people as Brahmins. When he met Lord Raam, he observed that while talking to him Lord Raam was watering and tending a plant. This created an awareness in him for taking care of the plants and environment. He studied plants and invented a tool "Nav Parashu" after him. After such extreme measures undertaken in his life he realised the wisdom of self control and gave a message to his people that we should be like a sea, which does not cross its given limits. This message he gave through a mantra "Oum namo bhagawate maryadayye", meaning honour the limits or self control or don't go to extremes.
Having committed lot of violence, Lord Parshuram realised the value of non-violence and virtues of self control. It requires lot of guts and courage to experiment, realise the wrong and correct the behaviour and it may be because of this rare quality that he is still considered the Founder of Brahmins .
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

निर्भीड--
अमर्याद परशुराम !
कोणी तरी टोचले की ज्या समाजाचा आद्य पुरुष परशुराम आहे, त्यांना अहिंसेबद्दल बोलायचा काही अधिकार नाही. परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती, एवढीच मला माहीती होती. त्यामुळे एक अपराधीपण आले. खरे तर आमच्या वडिलांनी ब्राह्मण्याच्या कुठल्याच लौकिक खुणा आम्हाला कधी दाखवल्या नाही. आमच्या कोणाच्या मुंजी झाल्या नाहीत. एका भावाने मराठा मुलीशी लग्न केले, आणि कुठलेच धार्मिक विधी आम्ही कधी केले नाहीत. वडिलांचे वा आईचे श्राद्धही आम्ही केले नाही. तरीही आम्ही ब्राह्मण आहोत असे कोणी म्हणाले तर ते लागतेच. त्यात मला तर ह्या आद्य पुरुषाविषयीही फारशी माहीती नाही. कोण होते परशुराम ?
विनोबा भावेंच्या शब्दात ( विनोबा सारस्वत--सं: राम शेवाळकर, साहित्य अकादेमी प्रकाशन ) हा त्या काळचा सर्वोत्तम पुरुषार्थी माणूस होता. आई क्षत्रीय तर बाप ब्राह्मण. हा भयंकर पितृभक्त होता. बापाच्या आज्ञेने ह्याने आईचे डोकेच उडविले. त्याकाळच्या क्षत्रीयांचा अत्याचार सहन न होऊन ह्याने २१ वेळा युद्ध करून पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती. तरीही क्षत्रीय राहिलेच. मग ह्याने अरण्ये तोडून कोकणात वस्ती केली व लोकांना चांगले विचार, आचार व उच्चार शिकविले व तुम्ही ब्राह्मण झालात असे घोषित केले. परशुराम रामभक्त होता. रामाच्या भेटीच्या वेळी राम झाडाला पाणी घालत होता त्यावरून त्याला झाडे कुर्‍हाडीने तोडण्याऐवजी झाडे लावणे हे महत्वाचे आहे हा बोध झाला व नंतर त्याने वनस्पतीशास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्याने शोधलेल्या अवजाराला "नव परशु" असे म्हणतात व कोकणात जी फळझाडे जोपासलेली आहेत त्याचे कारणही त्याचा हा अभ्यासच असावा. आईचे डोके उडविणारा, पृथ्वी नि:क्षत्रीय करणारा हा परशुराम शेवटी शेवटी आपल्या जीवनाचे सार समुद्रासारखे प्रवृत्तींची मर्यादा हेच आहे असे म्हणतो व केलेल्या हिंसेची उपरती दाखवतो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा भक्त असलेला हा परशुराम शेवटी संदेश देतो की "ॐ नमो भगवत्यै मर्यादायै".
स्खलन झाल्यावर त्यातून शिकणे व सावरणे ह्याला खूपच मोठेपणा लागतो व म्हणूनच ब्राह्मण समाजाने अजूनही परशुरामाला आपले आद्यपुरुष म्हणून मानले असेल. ह्याच न्यायाने परशुरामाला, किंवा ब्राह्मणांना आता अहिंसेबद्दल बोलायला काहीच हरकत नसावी.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

बुधवार, २० ऑक्टोबर, २०१०

देशीवादाचा वृद्धाश्रम
एकेकाळी नेमाडे देशीवादासाठी फार प्रसिद्ध होते. देशीवाद तसा दिसायलाही खूप लोभस असे. पण आज तो कुठे आहे ?
वृद्धाश्रमात जशा सर्वांच्याच कहाण्या साधारण एकसारख्याच असतात तसेच काहीसे नेमाडेंच्या देशीवादाचे झाले आहे.
नेमाडे स्वत: आजकाल भाषणातून मराठीच्या काळजीपायी मुलांना फक्त मराठी माध्यमांच्या शाळातच पाठवा असे म्हणतात. पण ह्यांचे स्वत:चे शिक्षण इंग्रजी ह्या विषयाचेच झाले आहे. देशीवादासंबंधी टीकास्वयंवरात (पृ.१२२) वर ते म्हणाले होते :"आता आपल्या स्वत:च्या भाषासमूहाबाहेर आपण जे जे भाषिक वर्तन करतो त्याला सामान्य दर्जापलीकडे काही महत्व नसते." त्यानंतर ते स्वत:च्या पुस्तकांची इंग्रजीत भाषांतरे करून घेणार्‍यांची खिल्ली उडवतात. पण प्रत्यक्षात साहित्य अकादेमीच्या पुरस्कारांसाठी त्यांना आपल्याच पुस्तकांची भाषांतरे करून घेणे क्रमप्राप्त ठरते. आता हे वृद्धाश्रमातल्या कहाण्यांसारखेच झाले की !
नेमाडेंच्या "हिंदू" कादंबरीची वाखाणणी करण्यात सध्या एक नवी टूम चालू आहे. हरिश्चंद्र थोरात हे एक कार्यशाळा घेऊन हे सिद्ध करू पाहत आहेत की मिखाइल बख्तिन नावाच्या रशियन समीक्षकाच्या "द डायलॉगिक इमॅजिनेशन" ह्या पुस्तकात दिलेल्या निकषांवरून "हिंदू" ही कादंबरी ही अनन्यसाधारण ठरते. ( म्हणजे हिला मोठ्ठा अकादेमीचा सन्मान द्यावा !). आता स्वत: नेमाडे टीकास्वयंवरात म्हणून गेले आहेत ( पृ.१२३) की "आपण निर्माण केलेली प्रमाणके सोडून इतरांच्या प्रमाणकांचा स्वीकार करता कामा नये". शिवाय मालशे म्हणतात तसे बख्तिन हा काही हिंदू गृहस्थ नव्हता, त्याची प्रमाणके गृहित धरायला.
जे नेमाडे म्हणाले की "पाश्चात्य वेशभूषेचे अनुकरण करणार्‍या पुरोगामी आंतरराष्ट्रीय जीवनपद्धती जगणार्‍या शिक्षितांनी मात्र हा सर्वात सौंदर्यशील जुळणभाग परसंस्कृतीच्या दबावामुळे लज्जास्पद ठरवला" , त्यांना कधी कुणी धोतर कुडत्यात पाहिले आहे काय ? आजकाल तर ते सहा महिने कॅनडा व सहा महिने दहिसर असे रहात असतात. आता ह्यांची तिथली नातवंडे कुठल्या माध्यमाच्या शाळेत जात असतील ते सहजी कल्पना करण्यासारखे आहे. शिवाय "हिंदू" त ते गा‍र्‍हाणे घालतात की तिथे व्हिसा संपला की हाकलून देतात, हे काय बरे आहे का ? तसेच खेडयात राहण्याच्या देशी भावनेचे . स्वत: ते शहरात रहात आले आहेत. पण गुण गायचे खेडयात राहण्याचे.
"हिंदू" कादंबरीत देशीवादाच्या तत्वाविरुद्ध किती तरी उदाहरणे बघायला मिळतात. ज्या गालिबच्या शेरशायरीचे नेमाडेंना खूप अप्रूप आहे, ते काय मराठीत आहेत काय ? तसेच हिंदी सिनेमांच्या गीतांचे उदधृत करणे. मराठी सिनेमात काय गाणी नसतात काय ? तसेच सध्या इंग्रजी कादंबर्‍यात प्रचलित असलेल्या एका युगतीचे. उदाहरणार्थ मायकेल क्रिष्टन ह्यांच्या कादंबर्‍यात कथानकाच्या अनुरूपतेने खूप तांत्रिक माहीती वाचकांना दिलेली असते. जसे जुरासिक पार्क वगैरे. आता हा परदेशीच कल म्हणायचा. मग "हिंदू" त जी भरताड भरती अशी केलीय तिला काय म्हणायचे ? जसे ऍंथ्रॉपॉलॉजीचा एक किस्सा की माणूस आडव्याचा उभा झाला म्हणून भाषेचा जन्म झाला व तो जर पुन: चार हातापायावर रांगायला लागला तर भाषा नष्टही होईल. तसेच वाघ नष्ट होण्याची गोष्ट. गरम तव्याचा जोक, बोबड्या प्राध्यापकाचे बोलणे, स्त्री-दाक्षिण्य हे दक्षिणेच्या लोकांनी आणलेले वैशिष्ट्य त्याचा किस्सा, काही पोरकट कविता, नामांतराचा इतिहासात जमा झालेला सविस्तर भाग, विद्यापीठातले भ्रष्टाचाराचे रडगाणे, वगैरे. म्हणजे पहा, स्वत:च अशी अडगळ पेरायची व छदमीपणे रडायचे कशावर तर "जगण्याची समृद्ध अडगळ". ती ही "हिंदू" धर्मामुळे !
देशीवाद जसा स्वत: नेमाडेंनीच अशा अडगळीच्या वृद्धाश्रमात लोटला आहे तशीच ही कादंबरी अडगळीत व वृद्धाश्रमातच आता पहायला मिळेल !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

प्रती ज्ञानेश्वर नेमाडे,--ज्ञानेश्वराला काय दाखवतात ?
"हिंदू" ह्या प्रचंड खपलेल्या भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा:
"एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
ही संत ज्ञानेश्वरांची अतिशय हीन पातळीला जाऊन केलेली बदनामी आहे.
"संतसूर्य तुकाराम" कादंबरीत तुकारामाने तरुणपणी दुकानात आलेल्या पोरींच्या हातावर गोळी ठेवण्याच्य़ा मिषाने स्पर्श केला ( व इतर स्त्रिसुलभ आकर्षण दाखवले ) तर केवढा गहजब झाला. संमेलनाध्यक्षपदही गेले आनंद यादवांचे आणि इथे तर लेखक ह्या वेसकराला ज्ञानेश्वरांना हे काय भलतेच दाखवायला लावतोय. व वर परत फ्राइडचा सिद्धांत, दृष्टांत वगैरे. ह्याचा धिक्कारच व्हायला हवा.
कायदेशीर कारवाईही व्हायला हवी.
कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी स्टार माझा वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. शिवाय फ्राइड व खुद्द ज्ञानेश्वरांच्या काही ओळी उदधृत करून ते असे मांडत आहेत की ही ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारावरची ही रास्त प्रतिक्रिया आहे. जसे काही खुद्द ज्ञानेश्वरांच्या ओवीमधूनच हे सिद्ध होते.
ही जाणून-बुजून केलेली चतुराई व बदनामी आहे.ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ आता ह्य़ात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो.
शिवाय ह्या वेडसर वेसकराने धोतर उचलून जे दाखवले ते लेखक म्हणतो तसे "आम्हा पोरांना". त्यात महानुभावी पंथाचे लेवा पाटील नेमाडे व त्यांचे ब्राह्मण नसलेले मित्र आहेत. त्यामुळे हा दाब असलाच तर कुणब्यांच्या विरुद्धचा आहे. ब्राह्मणांच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या विरुद्धचा अजिबात होत नाही. लेखक हेच पुढे कबूलतो ते असे : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणेही वाईट व निषेधार्यच आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच.
प्रति-ज्ञानेश्वर नेमाडेंना एकमेवाद्वितीयतेचा गर्व जरूर व्हावा पण ते माउलींचा असा अपमान करू शकत नाहीत.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१९

नीतीची उत्क्रांती

सगळ्यांचा असा समज आहे की अमेरिकेत पैसा हेच सर्वस्व असून त्यामागेच ते धावताहेत. वॉल स्ट्रीट जर्नल हे तर बोलून चालून शेअर्स वाल्यांचे. आणि त्यात "उत्क्रांतीच्या मानस शास्त्रा " संबंधी इतकी सखोल बातमी, चर्चा यावी हे खूप आश्चर्याचे आहे.

बातमी अशी की कोणी प्रोफेसर, मार्क हाउझर नावाचे, हार्वर्ड विद्यापीठात होते. ते शिकवीत उत्क्रांतीचे मानसशास्त्र. ह्यात त्यांना असे दाखवायचे होते की माणसाचे नीतीमत्तेचे विचार हे निसर्गत: उत्क्रांत झाले आहेत व ते वैज्ञानिक पद्धतीने आपण मांडतो आहोत असे दाखवण्य़ासाठी त्यांनी काही माकडांवर प्रयोग केले व त्यातून नीतीमत्तेचे विचार कसे उत्क्रांत झाले आहेत, हे साधार दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता इथवर तरी काही वावगे वाटत नाही. पण पुढे म्हटले आहे की त्यांना विद्यापीठाने तीन वर्षांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर, अवैज्ञानिक पवित्रा बाळगल्याबद्दल,दोषी ठरवले आहे. ते सध्या एक वर्षाच्या रजेवर गेले आहेत. म्हणजे जवळ जवळ काढूनच टाकल्यासारखे.

अशा काय माकडचेष्टा ह्या महाशयांच्या अंगलट आल्या ? तर असे कळते की त्यांनी माकडांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहिजे तशा प्रयोगात बदलवून घेतल्या, त्या खर्‍या नव्हत्या. हार्वर्ड विद्यापीठाची ही फारच काटेकोर वैज्ञानिक जाणीव आपल्याकडे तर धसकाच आणणारी वाटेल. आपण पीएचड्यांचे प्रबंध चोरून डॉक्टर करतो आणि इथे एका प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाला प्रयोगात खोडसाळपणा केल्याबद्दल इतकी दखल ! बरे ह्या गृहस्थांचे बर्‍यापैकी नाव आहे, "मॉरल माइंडस" नावाचे एक पुस्तक गाजलेले आहे, इंटरनेट वर "मॉरल सायन्स टेस्ट" नावाची एक टेस्ट ह्यांची प्रसिद्ध आहे ( सध्या ती काढलेली आहे ) आणि हे बर्‍यापैकी गाजलेले आहेत. पण नुसते त्यांनी आपले मत म्हणून हे मांडले असते तर मानसशास्त्रासारख्या कलाविषयात हे धकण्यासारखे होते. पण त्याचे शास्त्र करायचे, प्रयोग करायचे व त्यात खोटेपणा करायचा ह्याने हार्वर्डसारख्या विद्यापीठाला नक्कीच बट्टा लागल्यासारखे आहे. विज्ञानाची इतकी मानमराबता वाखाणण्यासारखी तर आहेच, शिवाय अर्थव्यवस्थेने इतके त्रस्त केलेले असताना वॉल स्ट्रीट सारख्या वर्तमानपत्राला ह्या बातमीचे अप्रूप वाटावे व ते त्यांनी सविस्तर समजून सांगावे ही सुद्धा अपार कौतुकाची बाब आहे.

पैशासाठी पदोपदी नीतीमत्ता पायदळी घेणार्‍या अमेरिकेला आपली नीतीमत्ता कशी बनते ह्याचा अभ्यास शास्त्रीय काटेकोरपणे व्हावा असे वाटावे हीच खूप महान नीतीची गोष्ट आहे व त्यासाठी त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे !

अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Nirbheed Vha----19 ( Be Bold ! )

Valuing Evolutionary Psychology

We presume that whole America is in hot pursuit of money and wealth. And Wall Street Journal, as the name suggests should be all about money. On such a background it is refreshing thought to see that it has given such a prominant space for a news about Evolutionary Psychology.

The news is about virtual sacking of one professor, Mr. Marc Hauser, of Harvard University, for his scientific misconduct on eitht counts. The professor has already confessed of a "mistake" and has proceeded on one years leave of absence. This professor was quite popular in Psychology circuit through his book "Moral Minds: How Nature designed our universal sense of right & Wrong" and various tests on internet. What the professor was trying to do in the university through research on monkeys is that our sense of morals has been developed through the evolution and it does not owe the pressures from relijgion, society or reason. While managing the experiments, it turned out that he manipulated the reactions of the monkeys to suit the conclusions, which is a moral sin in Science. What is so noteworthy in the episode is that while the natiion is going through economic and social turmoil, the newspaper values the upkeep or morals of Universily, thereby nurturing the scientific fabric in the society. All the kudos to the Wall Street Journal and Harvard University for such high standards !

When in everyday pursuite of money, in various walks of life, we find the scant attention we give to morals and its evolution, it is so heartening to see that the newspaper has taken lot of space and efforts in explaining why morals have to be kept upright whether they are evolved through nature or otherwise !


Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१८

कंपन्या व सामाजिक बांधीलकी

इथले एक प्राध्यापक श्री.अनील करनानी ह्यांनी वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या मते कंपन्यांना फायदा कमावणे हाच एकमेव हेतु असतो व सामाजिक बांधीलकी वगैरे सब झूट असते.

जगातले सर्वात श्रीमंत गृहस्थ श्री.बिल गेट्स ह्यांचे उदाहरण घेतले तर एक गंमत पहायला मिळते. अवघ्या १६/१७ व्या वर्षी कॉलेज शिक्षण सोडून संगणक कंपनी हा मुलगा सुरू करतो, पेटून एका ध्यासापायी जगातला अव्वल श्रीमंत होतो, आणि आता स्वत:च्या मुलांसाठी अगदी मोजकी संपत्ती ठेवून, जगातला सर्वात मोठ्ठा दानशूर होतो. भारतात दारिद्र्यनिर्मूलनाचे व एड्सचे ह्यांचे प्रचंड कार्य चालते. जेव्हा ते कंपनी चालवीत होते तेव्हा संगणक हेच त्यांचे सर्वस्व होते. इतके की ते सहकार्‍यांवर ओरडत की इतका मूर्खपणा मी कधी पाहिला नाही, किंवा कंपनीचे ऑप्शन्स विकून तुम्ही जागतिक शांतता पथकात का नाही सामिल होत ? हाच गृहस्थ आता म्हणतो की सर्व जीवांना समान मान मिळायला हवा व सर्वजण माझे बरोबरचे भागीदार आहेत. आणि इतके करूनही ते आता जरी निवृत्त झालेले असले तरी त्यांच्या अध्यक्षतेखालची त्यांची कंपनी प्रचंड नफा कमावणारीच म्हणून ओळखल्या जाते.

जरी त्यांचे शिक्षण त्यांना अर्धवट सोडून द्यावे लागले तरी अजूनही संगणक व विज्ञानात त्यांचा अभ्यास प्रचंड ताकतीचा असून त्याबद्दल त्यांना जागतिक मान सदैव मिळत असतो. ते राहतातही फार साधेपणाने. श्रीमंतांचे राहणे आपण टीव्हीवर कौतुकाने पहात असलो तरी ह्यांचे साधे राहणे लोकांना मोह घालते. आता जाणवणारी त्यांची सामाजिक बांधीलकी ही खरी म्हणायची की अजूनही कंपनी व्यवहारातली ह्यांची नफेखोरी खरी समजायची हा पेच आपल्याला पंचायतीत टाकतो.

भारतातल्या प्रत्येकाला सदरा मिळेल तेव्हाच मी शर्ट घालीन असे सामाजिक बांधीलकीने व्रत पाळत जन्मभर उघडे राहणारे गांधीजी ह्यांना आपण ह्या बांधीलकीच्या सन्मानार्थच "महात्मा" म्हणतो. असे महात्मापण बिल गेट्स ह्यांना मिळणारे नसले तरी त्यांची आत्ताची सामाजिक बांधीलकीची जाणीव आपण थोटी ठरवू शकत नाही.

शेवटी समाज हा एखाद्या जगन्नाथाच्या रथासारखा असतो. तो सर्वांनाच ओढायचा असतो. काही जण खूप जोर लावतात पण त्याने रथाची गती तेव्हढीच राहते, तुम्ही बिडी-काडी साठी क्षणभर बाजूला उभे राहिलात तरी रथ चालूच असतो. फक्त तुम्ही त्याच्या मार्गात सुरुंग पेरू नयेत, पाचरी मध्ये मध्ये घालू नयेत म्हणजे झाले. गरीब शेतकरी कर्जाच्या बोझ्या पायी आत्महत्या करतो, पण कृषी मंत्र्याच्या मालमत्तेला हात लावीत नाही, ह्यात गरीबांची सामाजिक बांधीलकी ज्यास्त दिसून येते, व कृषीमंत्र्यांना सारखे माझी मालमत्ता कशी नाहीय, असे सांगत राहावे लागते त्यात त्यांच्या नसलेल्या बांधीलकीचे दर्शन होते. उद्या जर कृषीमंत्र्यांनी बिल गेट्स सारखा मोठ्ठा निधी उभारला तर जरी शंभर उंदीर खाऊन झाल्यावर हजला निघालेल्या मांजरीसारखे ते भासले तरी आपल्याला त्यांची बांधीलकी मानावीच लागेल. पण तोपर्यंत आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या, कायदा हातात न घेण्याच्या सामाजिक बांधीलकी बद्दल सर्वांनाच ऋणी राहावे लागेल. जगातल्या गरीबांची अशी सामाजिक बांधीलकी, हेच जगातल्या श्रीमंतांचे रहस्य आहे. कंपन्यांना आपण भरपूर नफा करू देतो ह्यात गिर्‍हाइकांची सामाजिक बांधीलकी आहे. कंपन्यांची नव्हे !

अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Nirbheed vha---18

Companies & their Social Responsibilities

Mr.Anil Karnani has opened up a controversy over companies not having social responsibilities and how that is necessary for efficiency, in an article in recent Wall Street Journal.

When we look at the richest man Mr.Bill Gates, it makes an interesting situation. When he was running the company, which he founded at an early age, he was passionate about the computers, innovation and maintaining the lead in the trade. Now he is not only the richest man, but a great philanthropist, and talking about only social responsibility. He was so ruthless when he was leading the company that he used to tease his subordinates by demeaning remarks such as : "This is the stupidest thing I have ever seen, or Why don't you sell your options and join the peace core ?" And now, he proudly declares that his guiding principle is humility, equal honour for everybody and treating everybody as respected colleague. We are at a loss to understand whether his passion for profits was paramount or his social outlook is laudable now !

When Gandhiji decided to shun the shirt till everybody gets one to wear, we very clearly see the ultimate and pure social responsibility without any shades . Perhaps that is why we call him "Mahatma" for the same.

Society, I think, is like a Jagannath's Chariot. Everyone is required to pull it. Those who pull it with full fury and passion still can't make it gallop greatly and those who take a little bit of rest from pulling it, does not slow it down. Only thing is that keeps at a normal speed unless someone does not spread mines underneath or put wedges in its path.

Farmers who committ suicide due to poverty, instead of thinking snatching part of the properties of the Agriculture Minister, show in fact a remarkable sense of social responsibility which the Agriculture Minister lacks when he has to take pains in convincing that he does not own huge properties. If he makes a huge fund for farmers as comparable with Bill Gates , then even if it appears as the cat going to Haj after eating hundred rats, we may have to concede social responsibility to the Minister. But till then the farmers suicides ( and not snatching properties forcibly ) should paint the social responsibility of theirs,in bold colours. In fact, this could be the secret of all rich people that the poor show their social responsibility by allowing them to become rich. Companies do prosper at the cost of willing customers and it is their(customers') social responsibility that we should praise !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

रविवार, २२ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१७

मंदीर यही बनायेंगे !

बाबरी मस्जीद-राम मंदीर प्रकरण ऐकले की अमेरिकेतले लोक आपल्याला हसत असत. त्यांना वाटे एवढया पुढारलेल्या काळात काय हे लोक धर्माचा बाऊ करून बसताहेत. पण आता त्यांचाच मटका बसलाय. कारण ज्या वर्ल्ड ट्रेड सेंटरला आतंकवाद्यांनी जमीनदोस्त केले त्याच झीरो ग्राऊंडवर मशीद उभारण्याचा प्रस्ताव मुस्लिम समाजाकडून आला आहे. अगदीच त्याच जागी नसले तरी दोन कि.मी. अंतरावर मशीद व इतर स्मारक म्हणजे अमेरिकेच्या सहनशीलतेची कसोटीच आहे.

अमेरिकेचे नवीन अध्यक्ष बराक ओबामा हे मधल्या नावाने मुसलमान आहेत ह्याचा अमेरिकेला भारी अभिमान होता. त्यात मुस्लिम समाजाशी सौजन्याचे धोरण ठेवत ओबामांनी पहिलेच भाषण कैरोत करीत जे सौहार्दाचे आवाहन केले ते तर फारच प्रभावी होते. आता हेच आवाहन त्यांच्या अंगलट येत आहे. ज्या मुल्लाने एकेकाळी सीआयए ला मदत केली तोच आता ह्या मशीदीसाठी परवानगी मागतो आहे व मुस्लिमांच्या द्वेषाला अमेरिकाच जबाबदार आहे असे म्हणतोय. म्हणजे परत तो ज्यास्त प्रभावी धार्मिक बनला आहे. आता अमेरिका म्हणते आहे की तुम्हाला तुमची मशीद उभारण्याचा हक्क जरूर आहे पण इथेच का, व ह्यामागे कोणाचे पैसे आहेत तेही पाहिले पाहिजे.

ह्यासंदर्भात अयान हिरसी अली ह्या विदुषीचे मत आहे की तुम्ही कितीही आव आणलात तरी हटिंग्टन ने म्हटल्यासारखे मुस्लिम व ख्रिश्चन ह्या दोन संस्कृतींचाच हा लढा आहे. क्लॅश ऑफ सिव्हिलाइझेशन्स . अयान हिरसी अलीचे नोमॅड नावाचे स्वानुभाववरचे एक पुस्तक नुकतेच आले आहे. त्यात ती आफ्रिकेतून अमेरिकेपर्यंत कशी लढत आली व स्त्रियांवर अजूनही मुस्लिम समाजात कसे अत्याचार होताहेत ह्यासंबंधी अनुभवाचे बोल आहेत. तिच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेतले सुधारलेले मुस्लिमही कोवळ्या मुलींची बेधडक सुन्ता करतात, फक्त कबूल करीत नाहीत. तिने एका ख्रिश्चन मिशनर्‍याला म्हटले आहे की तुम्ही भले धर्मांतरे नका करू पण मुस्लिम समाजाला जरा मवाळ करण्यासाठी ठोस व ठाम पावले उचलायला हवीत. नाही तर मुस्लिम समाज असाच धर्मवेडा राहील.

ग्राऊंड झीरो जवळ मशीद का नको त्याचे दृश्य कारण हे लोक असे देतात की धार्मिक सामंजस्याचे प्रतीक वाटण्यापेक्षा इस्लामच्या हिंसेच्या विजयोन्मादाचे ते ज्यास्त प्रतीक ठरेल. लॉस एंजेल्सला एक म्युझियम आहे, "सिमोन विझेंथॉल" ह्यांच्या नावाने. हे आहे म्युझियम ऑफ टॉलरन्स, सहनशीलतेचे संग्रहालय. तशी सहनशीलता आजकाल संग्रहालयात ठेवण्याचीच वस्तु झाली आहे. आपण पाहतोच की व्यवहार्य कारणांसाठी युरोपात सुद्धा अनेक ठिकाणी बुरख्यावर बंदी आणली आहे कारण धर्मापेक्षा स्त्रीला मानाचे प्रतीक करणे त्या त्या सरकारांना ज्यास्त महत्वाचे वाटते.

अमेरिकेत व्यवहारी असण्याला ज्यास्त महत्व आहे. सध्या कॅलिफोर्नियात एक प्रपोजल २३ नावाचे विधायक मतदानासाठी येत आहे. पूर्वी कबूल केलेले पर्यावरणाचे आकडे तूर्त बेकारी सुधरेपर्यंत लागू होऊ नयेत नाही तर उद्योग परत बाहेर जातील असा हा प्रस्ताव आहे व बर्‍याच मोठ्या कंपन्या ह्यासाठी करोडो खर्च करीत आहेत. म्हणजे पहा पर्यावरणाच्या विरुद्ध जाताना अमेरिकेला काही वाटत नाही कारण ते त्यांच्या व्यवहाराचे आहे.

भारतासाठी तर हे फारच महत्वाचे धोरण ठरावे. कारण भारतात मुस्लिम व हिंदू हाच संस्कृतींचा झगडा आहे. आणि हिंदू त्यांच्यातल्या असंख्य प्रवाहांमुळे फारच मवाळ तर मुळातच मुस्लिम ज्यास्त धर्मवेडे. मुस्लिमांच्याच भल्यासाठी हिंदूंनी ज्यास्त धर्मकठोर होणे जरूरीचे आहे. अर्थात त्यांची (मुस्लिमांची ) आर्थिक स्थिती, नोकरी व्यवसाय, संबंधी उदारमतवादी धोरण ठेवावेच लागेल. पण धार्मिक बाबीत हिंदूंनी आग्रही होणे आवश्यक ठरणारे आहे.

त्यासाठी बाबरी मस्जीद प्रकरणात माघार न घेता ठणकाऊन "राम मंदीर"चा मुद्दा लावून धरायला हवा, त्याच्याशिवाय मुस्लिम मवाळ होणार नाहीत, असे अमेरिकेतले उदारमतवादी धोरण पाहता वाटायला लागले आहे. इथले जनमत वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ मशीद होऊ देण्याच्य़ा पार विरुद्ध आहे व ते तसे ठणकावून सांगू लागले आहेत. मुस्लिमांना मवाळ होण्याचा हा चांगला मार्ग आहे !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Nirbheed Vhaa---17

Raam Mandir Due to America !

Americans used to laugh at our age old issues of Babri Masjid--Raam Mandir thinking that we are not sufficiently secular as they think they are. But things are turning topsy turvy for them. A proposal for a Masjid near the ruins of World Trade Center ( Ground Zero ) has come up and has become the talking point all over America. And it is slowly revealing the thin veil of Secularism that America is presently wearing .
America, no doubt, accepts that Muslims have a right to have their place of worship wherever they want but having it so near to ground zero does not meet with their approval. Though the Mulla concerned was so friendly at one time that he used to help CIA but now they are questioning the sources of funds and the propriety of having the Masjid so near to Ground Zero. Now perhaps it is the rest of the world's turn to see the true colours of American Secularism.
In this context the views of Ayaan Hirsee Ali are quite interesting. She is presently in news due to her recent book "Nomad", which is her personal story of plight from Africa to America and tortures of Islaam. She is conceding in one interview that ultimately it is a clash of civilisations ( as claimed by famous book of Huttington's "Clash of Civilisations") and for the sake of Muslims she pleads that Cristians should show a strong posture which in her opinion will help Islaam to reduce ill-treatment to women. She tells us that even in America the so called educated muslims force circumcision on their girls though they do not admitt it.

One reason Americans give for opposing the mosque near Ground Zero, is that it will appear more as a symbol of victory of Islaam's violent acts, than the tolerance of Americans. In this context it is interesting to note that there is a Museum at Los Angels in the name of Simon Wiesenthal on the subject of "Tolerance". If we look around we may find that these days tolerance is a thing to be found in musems alone. Govts in Europe have already boldly banned the veil for Muslim ladies as they think it liberates them to the level of the freedom of other ladies, which these govts. value more important than relegious identity.
America has a tradition of foregoing what is ethical and ideal for the immediate and practical. Presently they are bringing a proposition-23 in California, by which they want to go back on the committed environmental values till the present un-employment rate goes sufficiently down. Big companies are openly spending money to say no to this proposal lest industries flee out of the state.

This line of thought of Ayaan Hirsee Ali is interesting on the background of India's cronic problem of Hindu-Muslim relations. We had been given to accept very low levels of religiousness, thinking that this could be called as secularism of Hindus and will help Muslims also to reduce their strong religious fervour. But history tells us that it has not. Perhaps Muslims must be viewing it as weakness of Hindus. Hence it is worth a try to be more agressive for Hindus and perhaps demand the Ram Mandir. Seeing the way of the world's most secular society i.e, american society is behaving boldly towards Muslims it is worth trying for Indian Hindus to adopt a stronger stance in the context of Hindu-Muslim relations !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

शनिवार, २१ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१७

मंदीर यही बनायेंगे !

बाबरी मस्जीद-राम मंदीर प्रकरण ऐकले की अमेरिकेतले लोक आपल्याला हसत असत. त्यांना वाटे एवढया पुढारलेल्या काळात काय हे लोक धर्माचा बाऊ करून बसताहेत. पण आता त्यांचाच मटका बसलाय. कारण ज्या वर्ल्ड ट्रेड सेंटरला आतंकवाद्यांनी जमीनदोस्त केले त्याच झीरो ग्राऊंडवर मशीद उभारण्याचा प्रस्ताव मुस्लिम समाजाकडून आला आहे. अगदीच त्याच जागी नसले तरी दोन कि.मी. अंतरावर मशीद व इतर स्मारक म्हणजे अमेरिकेच्या सहनशीलतेची कसोटीच आहे.

अमेरिकेचे नवीन अध्यक्ष बराक ओबामा हे मधल्या नावाने मुसलमान आहेत ह्याचा अमेरिकेला भारी अभिमान होता. त्यात मुस्लिम समाजाशी सौजन्याचे धोरण ठेवत ओबामांनी पहिलेच भाषण कैरोत करीत जे सौहार्दाचे आवाहन केले ते तर फारच प्रभावी होते. आता हेच आवाहन त्यांच्या अंगलट येत आहे. ज्या मुल्लाने एकेकाळी सीआयए ला मदत केली तोच आता ह्या मशीदीसाठी परवानगी मागतो आहे व मुस्लिमांच्या द्वेषाला अमेरिकाच जबाबदार आहे असे म्हणतोय. म्हणजे परत तो ज्यास्त प्रभावी धार्मिक बनला आहे. आता अमेरिका म्हणते आहे की तुम्हाला तुमची मशीद उभारण्याचा हक्क जरूर आहे पण इथेच का, व ह्यामागे कोणाचे पैसे आहेत तेही पाहिले पाहिजे.

ह्यासंदर्भात अयान हिरसी अली ह्या विदुषीचे मत आहे की तुम्ही कितीही आव आणलात तरी हटिंग्टन ने म्हटल्यासारखे मुस्लिम व ख्रिश्चन ह्या दोन संस्कृतींचाच हा लढा आहे. क्लॅश ऑफ सिव्हिलाइझेशन्स . अयान हिरसी अलीचे नोमॅड नावाचे स्वानुभाववरचे एक पुस्तक नुकतेच आले आहे. त्यात ती आफ्रिकेतून अमेरिकेपर्यंत कशी लढत आली व स्त्रियांवर अजूनही मुस्लिम समाजात कसे अत्याचार होताहेत ह्यासंबंधी अनुभवाचे बोल आहेत. तिच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेतले सुधारलेले मुस्लिमही कोवळ्या मुलींची बेधडक सुन्ता करतात, फक्त कबूल करीत नाहीत. तिने एका ख्रिश्चन मिशनर्‍याला म्हटले आहे की तुम्ही भले धर्मांतरे नका करू पण मुस्लिम समाजाला जरा मवाळ करण्यासाठी ठोस व ठाम पावले उचलायला हवीत. नाही तर मुस्लिम समाज असाच धर्मवेडा राहील.

भारतासाठी तर हे फारच महत्वाचे धोरण ठरावे. कारण भारतात मुस्लिम व हिंदू हाच संस्कृतींचा झगडा आहे. आणि हिंदू त्यांच्यातल्या असंख्य प्रवाहांमुळे फारच मवाळ तर मुळातच मुस्लिम ज्यास्त धर्मवेडे. मुस्लिमांच्याच भल्यासाठी हिंदूंनी ज्यास्त धर्मकठोर होणे जरूरीचे आहे. अर्थात त्यांची (मुस्लिमांची ) आर्थिक स्थिती, नोकरी व्यवसाय, संबंधी उदारमतवादी धोरण ठेवावेच लागेल. पण धार्मिक बाबीत हिंदूंनी आग्रही होणे आवश्यक ठरणारे आहे.

त्यासाठी बाबरी मस्जीद प्रकरणात माघार न घेता ठणकाऊन "राम मंदीर"चा मुद्दा लावून धरायला हवा, त्याच्याशिवाय मुस्लिम मवाळ होणार नाहीत, असे अमेरिकेतले उदारमतवादी धोरण पाहता वाटायला लागले आहे. इथले जनमत वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ मशीद होऊ देण्याच्य़ा पार विरुद्ध आहे व ते तसे ठणकावून सांगू लागले आहेत. मुस्लिमांना मवाळ होण्याचा हा चांगला मार्ग आहे !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Nirbheed Vhaa---17

Raam Mandir Due to America !

Americans used to laugh at our age old issues of Babri Masjid--Raam Mandir thinking that we are not sufficiently secular as they think they are. But things are turning topsy turvy for them. A proposal for a Masjid near the ruins of World Trade Center ( Ground Zero ) has come up and has become the talking point all over America. And it is slowly revealing the thin veil of Secularism that America is presently wearing .
America, no doubt, accepts that Muslims have a right to have their place of worship wherever they want but having it so near to ground zero does not meet with their approval. Though the Mulla concerned was so friendly at one time that he used to help CIA but now they are questioning the sources of funds and the propriety of having the Masjid so near to Ground Zero. Now perhaps it is the rest of the world's turn to see the true colours of American Secularism.
In this context the views of Ayaan Hirsee Ali are quite interesting. She is presently in news due to her recent book "Nomad", which is her personal story of plight from Africa to America and tortures of Islaam. She is conceding in one interview that ultimately it is a clash of civilisations ( as claimed by famous book of Huttington's "Clash of Civilisations") and for the sake of Muslims she pleads that Cristians should show a strong posture which in her opinion will help Islaam to reduce ill-treatment to women. She tells us that even in America the so called educated muslims force circumcision on their girls though they do not admitt it.
This line of thought of Ayaan Hirsee Ali is interesting on the background of India's cronic problem of Hindu-Muslim relations. We had been given to accept very low levels of religiousness, thinking that this could be called as secularism of Hindus and will help Muslims also to reduce their strong religious fervour. But history tells us that it has not. Perhaps Muslims must be viewing it as weakness of Hindus. Hence it is worth a try to be more agressive for Hindus and perhaps demand the Ram Mandir. Seeing the way of the world's most secular society i.e, american society is behaving boldly towards Muslims it is worth trying for Indian Hindus to adopt a stronger stance in the context of Hindu-Muslim relations !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

बुधवार, ४ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१६
अमेरिकेत महात्मा गांधी !

परमेश्वराचे दर्शन कुठे होईल त्याचा जसा नेम नाही तसेच आजकाल कोणत्या देशात काय नियम पाह्यला मिळेल त्याचा काही नेम नाही. इथल्या बातम्या पाहता महात्मा गांधी व त्यांचे विचार भारतात आढळण्यापेक्षा इथेच ज्यास्त पहायला मिळत आहेत, असे वाटते. बातमी अशी की कोणी एक बाई आहे, काळी. ती आपल्या तीन मुलांसह सध्या एका अलीशान घरात, २ हजार चौरस फुटाच्या, तीन बाथरूम्स असलेल्या, तीन बेडरूम्स असलेल्या, सोफा वगैरे फर्निचर असलेल्या घरात रहात आहे. ज्या अमेरिकेत सुबत्ता आहे तिथे ३००० डॉलर महिना कमावणार्‍या बाईने असल्या घरात राहणे ही बातमी कशी होऊ शकते असे आपल्याला प्रथम वाटते. पण तपशील वाचल्यावर कळते की इथे सेक्शन-८ नावाची एक सोय आहे. त्या अंतर्गत बाजारातले भाडे १४०० डॉलर असले तरी हया बाईला फक्त ७०० डॉलरच भरावे लागतात, बाकीचे सरकार भरते. घराचा मालक खाजगी आहे. त्याला भाडेकरू शोधण्य़ाची तसदी नाही, शिवाय सामान खराब केल्यास तक्रार केली तर भाडेकरू बदलून मिळतो. ह्या स्कीम खाली चार ते पाच हजारांची प्रतीक्षा यादी आहे, तर चार वर्षांनंतर नंबर लागतो. भाडेकरूला चांगल्या लोकवस्तीत रहायला मिळते ते वेगळेच.
असेच ठिकठिकाणी होमलेस( ह्यांना आपण निराधार म्हटले असते, म्हणजे भिकारीच ) शेल्टर्स नावाचे प्रकार आहेत. काही शेल्टर्स फक्त बायकांसाठी, तर काही पुरुषांसाठी. इथे चांगल्या पलंगावर ( फोल्डिंगचे ) अंथरूण पांघरूणासह रात्री झोपायला मिळते. काही शेल्टर्स मध्ये तिथेच, तर काही ठिकाणी आजूबाजूला, "सूप किचन" नावाचे मोफत अन्नालय असते. इंटरनेटवर इथल्या सोय़ी बघायला मिळतात. लहान मुलाला घेऊन अशाच शेल्टर्स मध्ये राहणार्‍या व नंतर लक्षाधीश होणार्‍या एका काळ्या माणसाच्या खर्‍या गोष्टीवर एक अप्रतीम इंग्रजी सिनेमा पाहिलेला आठवत असेल. ही इथली पद्धत पाहून महात्मा गांधींच्या मनात अंत्योदयाची जी कल्पना होती ती ह्यापेक्षा काही वेगळी नव्हती, हे सहजी पटावे. आपण भारतीय अभिनिवेषाने म्हणू की हे गांधींजींनी शिकविलेले आहे, पण मुन्नाभाई सिनेमातल्या गांधींना दर्शन द्यावे वाटले तर अशाच कुठल्या शेल्टर मध्ये ते भेट देतील व आपल्याला त्यांचे दर्शन आता अमेरिकेतच मिळेल, ते असे !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Nirbheed Vhaa--16
Meet Mahatma in America
Like we cannot be shure as to where we would be able to meet God, we are similarly unsure about what system we may encounter in which country. When we read daily news here we feel likely to meet Mahatma Gandhi and his thoughts more here than in India. The news is about some black woman, who earns 3000 Dollars per month, but is staying at a palatial house of 2000 sq.ft. The house is having, the news says, 3 bed rooms, 3 bathrooms, nice furniture like sofa, carpet etc, and is in good localilty. The tenant lady pays only 700 Dollars a month and the rest is paid through subsidy from federal govt. This they say is under Section-8 provision. There are some 4000 tenants waiting under this scheme and it takes them 4 yrs to get such houses. The house owner is a private person and he gets an assured tenant and rent.
There are enough Homeless Shelters ( for these homeless, we would have called beggars in India ) around. These have folding cots and provide bed and linen. Mostly or sometimes at nearby place they also run "Soup Kitchens" where free food is provided. You must have seen a movie, based on a real story, of a black man living in such shelters alongwith his small child and becomes a millionaire later on.
Since we don't believe in re-incarnation we may not meet Mahatma Gandhi now in India, but like Munnabhai movie if the Mahatma ever thinks of visiting any place it would be some such Shelter as it befits his ideals of Sarvodaya ( the last man has to rise ). And if ever we meet such Mahatma , it could be here in America !


Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, २७ जुलै, २०१०

निर्भीड व्हा--१५

अमेरिकेची लोकशाहीची काळजी-५

अमेरिकेचे व्हियेतनाम युद्ध संपवण्यात "पेंटॅगॉन पेपर्स" नावाच्या कागदपत्रांचा जसा वाटा होता, तसाच वाटा सध्याचे इराक युद्ध संपवण्यात "इराक पेपर्स" ह्या पुस्तकातील कागदपत्रांचा व्हावा, हे वाचकाला प्रकर्षाने पटण्यासारखे आहे. अमेरिकेच्या लोकशाहीची हीच कदाचित ताकत व ओळख आहे असे म्हणता येईल. कारभार खूपच कार्यक्षमतेने व्हावा म्हणून राज्य चालवणार्‍या प्रमुखाला ( अध्यक्षाला ) अमर्याद अधिकार द्यायचे व पत्रकारितेने व जनतेने चर्चेतून, कागदोपत्री पारदर्षकता जपत, त्याला वेसण घालायची असा ह्यांच्या लोकशाहीचा एकूणच घाट दिसतो. ह्यालाच जागून सध्या विकीलीक्स नावाच्या संकेतस्थळावरून इराक-अफगाण युद्धाची हजारो कागदपत्रे वर्तमानपत्रातून प्रसृत होत आहेत. ह्याचा चांगला परिणाम जागतिक राजकारणात लवकरच दिसेल असे वाटते.

व्यक्तिस्वातंत्र्याची व भाषणस्वातंत्र्याची परिसीमा वाटावी असे अजून एक पुस्तक इथली पोरं-सोरंही वाचताना दिसतात, ते आहे जॉन स्टयुअर्ट ह्या "डेली शो" करणार्‍या विनोदवीराचे, "अमेरिका द बुक" . विनोदाबरोबरच ह्यात टारगटपणा इतका आहे की सुप्रीम कोर्टातल्या न्यायाधीशांचे ( ह्यात एक बाईही आहे ), नागडे फोटो दिले आहेत. असल्या वस्त्र-हरणाचा इतर कुठल्याही लोकशाहीत थेट गळाच घोटल्या गेला असता. पण इथे अगदी शालेय पुस्तकासारखे हे पुस्तक वाचल्या जाते, मजा करीत !

ह्याच जोडीला इथल्या लोकशाहीला आधार आहे तो मुक्त अर्थव्यवस्थेतल्या "पैसे कमावण्याचा" व त्याबद्दल बिलकुल काही न वाटण्याचा ! ह्या पुस्तकात इतकी सहजपणे माहीती येते की व्हाइस प्रेसिडेंट डिक चेनी हे कसे एका बलाढ्य तेल कंपनीचे ( हॅली बर्टन ) चेअरमन होते व इराक युद्धात अमेरिकन तेल कंपन्यांनी तेलाचे परवाने कसे हातोहात ढापले होते. ज्या वीकीलीक्स संकेतस्थळाने सध्याची युद्धाची रहस्ये उघडी केली आहेत,त्यांनी किती व कसे पैसे केलेत हेही पेपरात येते. ज्या बॅंका डुबल्या त्यांच्या अधिकार्‍यांनी बोनस म्हणून किती प्रचंड पैसे केले, ज्या आर्थिक मुक्त व्यवस्थेच्या दावेदार खाजगी कंपन्या आहेत त्या वेळोवेळी सर्व नीती-नियम धाब्यावर बसवून कसे पैसे लुटतात हे सर्व अमेरिकन लोकांना माहीत असते, फक्त त्यांना त्याचे सोयर-सुतक नसते ! प्रचंड पैशाची अजिबात लाज वाटू नये अशी ही अमेरिकन लोकशाही !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, २६ जुलै, २०१०

निर्भीड व्हा--१४
अमेरिकेची लोकशाहीची काळजी-४
माणसाचा पूर्वेतिहास जसा त्याच्या वर्तमानाचा व भविष्याचा लेखाजोखा सांगतो तसेच एखाद्या देशाचे वागणे त्याच्या इतिहासाला धरून असते असे "इराक पेपर्स" ह्या पुस्तकाच्या लेखकांना वाटते. निदान त्यामुळे आत्ताचे वागणे कळायला मदत होते. हे तसे रास्तच आहे, हे आपण डॉक्टर मंडळी रोगाचा इतिहास हमखास आधी विचारतात त्यावरून ताडू शकतो. अमेरिकेचा इतिहासही असाच रंजक असून त्यांचे सध्याचे वागणे,त्यांचे लोकशाहीचे प्रेम व प्रयत्न हे रहस्य उकलणारे आहे.

अमेरिकेचे सुबत्तेत, राजकारणात, ज्ञानात, अव्वल स्थान आहे हे तर वादातीतच. तसेच त्यांचे जागतिक स्तरावर कायम प्रभाव पाडण्याचे ध्येय असते हेही सर्वश्रुतच आहे. अर्थकारणात, लोकशाहीच्या कारभारात, मुक्त अर्थव्यवस्थेत, त्यांना ज्या देशांचा अडथळा येतो त्यांची ते अजिबात गय करीत नाहीत, असाच इतिहास आहे. त्यांच्या अंतर्गत लोकशाही साठी व आर्थिक सुबत्तेसाठी,वस्तु व कच्च्या मालाच्या अनिर्बंध पुरवठ्यासाठी, त्यांना बाहेरच्या देशातल्या सत्ता आपल्याप्रमाणे वळत्या करून घेण्याचा वा प्रसंगी उलथून टाकण्याचा नादच आहे. १९५४ मध्ये ग्वाटेमाला मध्ये अमेरिकेने आक्रमण करून तिथली साम्यवादी राजवट उलथून टाकली,ती "युनायटेड फ्रुट कंपनी ऑफ बोस्टन" ह्यांच्या फायद्यासाठी. कारण त्या काळी ग्वाटेमाला मध्ये २ टक्के जमीन-मालक ७० टक्के फळबागा बाळगून होते व तिथल्या सरकारात एकूण ५८ सभासदांपैकी ४ सभासद साम्यवादी होते. "इराक पेपर्स" ह्या पुस्तकात ही माहीती वाचत असताना केवळ तेलासाठी, अमेरिकेने इराकवर चढाई केली असे म्हणणार्‍यांचा युक्तिवाद सहजी पटण्यासारखा होतो. १९५३ मध्ये सी.आय.ए.च्या मदतीने ईराणच्या मोहमद मोसाद ह्यांच्या विरुद्ध उठाव करून शाह रझा पेहलवी ह्यांना बसवणे व तेलाची वाटणी करून घेणे, हे आता खूपच ओळखीचे वाटू लागते.असेच प्रकार अमेरिकेने पोर्टो-रिको,फिलिपीन्स,ग्वाम व क्युबा असेही हे पुस्तक सांगते. इतिहासातली कांगो, इंडोनेशिया, चिली, हैती, डॉमिनिकन रिपब्लिक, हवाई, ही प्रकरणेही अशाच प्रकारांसाठी बदनाम आहेत.ज्या रशिया कडून २ सेंट दर एकरी भावाने अलास्का हा मोठ्ठा भूभाग विकत घेतला त्या रशियाचा आंतरराष्ट्रीय पाडाव झाल्यानंतर तर अमेरिका ही एक सुपर-सत्ता झाली आहे, हे तर सर्वमान्यच आहे. आणि म्हणूनच ही सुपर-सत्ता लोकशाही मूल्ये राखणारी होणे अति महत्वाचे ठरते.

ही प्रकरणे जरी सर्वश्रुत असली तरी त्यानंतर प्रत्येक प्रसंगानंतर लोकांनी व नंतरच्या अध्यक्षांनी ह्या सर्व घटनांचा नुसताच निषेध नव्हे तर असे पुन्हा होणार नाही व अमेरिका लोकशाही परंपरा बाळगेल अशी खबरदारी घेतलेली आहे ही माहीती ह्या पुस्तकाचे लेखक आवर्जून सांगतात. आणि आपण ती ओबामा ह्यांच्या विजयाने ती आता प्रत्यक्ष पहातच आहोत. आणि केवळ ह्याच हेतूसाठी इराकच्या युद्धात सरकारने किती व कशा चुका केल्या हे सप्रमाण हे पुस्तक दाखवून देते. ह्याच लोकशाहीच्या काळजी पोटी मग पुस्तकाचे मोल चांगलेच वाढते.

ही सर्व पुस्तकातली माहीती किती ताजी आहे हे आजच्याच बातमीने पडताळता येते. विकीलीक्स नावाच्या संकेत-स्थळावर इराक युद्धाची हजारो कागद पत्रे प्रसिद्ध झाली असून आता लोकांना ह्या युद्धामागची रहस्ये खुली होत आहेत अशा अर्थाची बातमी आजच्याच ( २६ जुलै’१०) वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये वाचायला मिळेल.

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

रविवार, २५ जुलै, २०१०

निर्भीड व्हा--१३
अमेरिकेची लोकशाहीची काळजी--३
देशाच्या घटनेने लोकशाही विरोधात सामान्य जनतेला काही अधिकार दिलेले असतात. आपल्याकडेही हे अधिकार असणार. पण अमेरिकेत सरकार विरोधात लोकशाहीसाठी लढण्याची परंपराच असावी. कारण सरकारने जरी ११ सप्टेंबरच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या हल्ल्यानंतर पॅट्रियट अ‍ॅक्ट लागू करत विशेष अधिकार घेतलेले असले तरी जे नागरिकाचे लोकशाहीतले मूलभूत अधिकार असतात त्यानुसार लढण्याची अमेरिकेतली प्रथाच दिसते. कारण ही लढाई अन्याय्य आहे ही जाणीव व विरोध अमेरिकेत सर्वात प्रथम अगदी साधारण नागरिकांनीच करून दिली, असे "इराक पेपर्स" हे पुस्तक दाखवून देते.
अमेरिकेत "व्हिसल ब्लोअर अ‍ॅक्ट" अन्वये जर एखाद्या नागरिकाने सरकार विरुद्ध कारवाई केली तर कायद्याने त्याला त्याचा निकाल लागेपर्यंत संरक्षण मिळते. ह्यालाच इथे "विवेकी विरोधक" ( कॉन्शन्शियस ऑब्जेक्टर ) असे म्हणतात. इराक लढाई विरुद्ध पहिले पाऊल घेणारी एक महिला होती. कॅथरीन जॅशिन्सकी ही त्यांच्या सैन्यातली महिला शिपाई होती. तिने इराक युद्धात भाग न घेण्याचे ठरवले व २००४ साली तशी कारवाई केली. अशाच दुसर्‍या एका मरीन कोअर शिपायाला ( स्टीफन फंक) अशाच कारणास्तव २००४ साली अटक झाली. नॉन-कमिशन्ड ऑफिसर, कॅमिलो मेजिया ह्यालाही मग २००७ मध्ये अटक झाली. होता होता अजून आठ-दहा अधिकार्‍यांनाही तुरुंगवास पत्करावा लागला. ज्या ग्वांटानामो बे वर लढाईतले कैदी ठेवले होते त्यांना जिनेव्हा कन्व्हेंशन प्रमाणे वागणूक मिळत नाहीय असेही मग काही सैन्याच्या वकीलांनी दाखवून दिले. मग निवृत्त सेना-अधिकार्‍यांनी त्यांच्या सरकारवर खटलेच भरले.
त्यानंतरचा इतिहास आपल्याला माहीतच आहे. बुश सरकार जाऊन ओबामा यांचे सरकार आले व लढाई विरुद्ध जनमत चांगलेच तापले. तर लोकशाही साठी असा सामान्यांनीच पुढाकार घेतला तर त्याचीच एक छान लोकशाही परंपरा तयार होत असावी अमेरिकेत !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शनिवार, २४ जुलै, २०१०

निर्भीड व्हा--१२
अमेरिकेची लोकशाहीची काळजी-२
लोकशाहीत वर्तमानपत्रांची फार मोठी जबाबदारी असते व परंपरेने त्यांनी जनहिताची चाड ठेवणे आवश्यक असते. पण मीडीयातही शेवटी माणसेच असतात व सत्तेपुढे माणसे नमतातच. अशी फार थोडी माणसे असतात की जी एखाद्या चुकीच्या जनहित विरोधी निर्णया विरुद्ध स्वत: खंबीरपणे उभी राहतात व इतरांनाही धीर देतात.
अमेरिकेने इराक विरुद्ध लढाईचा निर्णय घेतला व चढाई केली ह्या घटनेविरुद्ध कोणी पत्रकाराने पवित्रा घेणे अमेरिकेच्या दृष्टीने राष्ट्रदोह करण्यासारखेच होते. अशा परिस्थितीत "न्यू यॉर्क टाइम्स" ने बुश यांना पाठिंबा देत सरकारी धोरणाची भलामण केली तर ते समजण्यासारखे आहे. पण देशात जर चर्चा करण्याची, खरे खोटे करण्याची परंपरा असेल तर चुकीची कबूली देऊन आपले धोरण सुधारण्याचे धारिष्टय फारच कमी वेळा पहायला मिळते. ज्युडिथ मिलर ह्या बाईची वात्रापत्रे सरकार जसे सांगे त्याचीच री ओढणारी असायची. सद्दाम हुसेन कडे अण्वस्त्रांचा साठा आहे असे सरकारच म्हणत असताना ही बाई त्याचे खरे खोटे करू शकणे हा अवघडच प्रकार होता. त्यामुळे तिचे लेख न्यू यॉर्क टाइम्स धडधडीत छापत राहिला.
कालांतराने विरोध जसजसा जाहीर होऊ लागला तसे टाइम्स ला आपली चूक लक्षात आली. मे,२००४ मध्ये त्यांनी एका तिर्‍हाईत संपादकाकडून शहानिशा करून ह्या बाईला संपादक पदावरून काढून टाकले, वाचकांची क्षमा मागितली व परत असे होऊ नये म्हणून ऑडिट करणारा एक खास संपादक नेमला.
ह्या प्रकरणाची माहीती "इराक पेपर्स" ह्या वरील पुस्तकातून मिळते व अमेरिकेची लोकशाहीची काळजी कशी मोलाची आहे हे ध्यानात येते.

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, २३ जुलै, २०१०

निर्भीड व्हा --११
अमेरिकेची लोकशाहीची काळजी
लोकशाहीच्या परंपरा खोल व दीर्घ काल रुजाव्या लागतात हेच खरे. ज्या लोकशाहीच्या नावाने एक अमेरिकेचा अध्यक्ष ( जॉर्ज बुश-२) इराकवर सर्व जगाला धाब्यावर बसवून चक्क लढाई करतो, त्यात हजारो लोकांचे प्राण जातात त्याच अमेरिकेत लोकशाही परंपरेचे लोकांना इतके भान असते की लोकलज्जेचे निर्भीडपणे वाभाडे तिथले लोक सहजी काढतात.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस तर्फे नुकतेच प्रकाशित झालेले "इराक पेपर्स" नावाचे पुस्तक वाचून ही खात्री होते. जॉन एरेनबर्ग व इतर तीन प्राध्यापकांनी लिहिलेले हे पुस्तक मार्च २०१० साली प्रसिद्ध झाले. ह्यात सरकारने जी कागदपत्रे २००५-६ साली जनतेसाठी खुली केली आहेत त्याच्या आधारे इराक युद्धाचा इतिहास व त्यावरची टिप्पणी केली आहे. मुळात गुप्त कागदपत्रे जनतेसाठी खुली करणे हीच फार मोठी लोकशाही व निर्मळ परंपरा आहे. आपल्या कडची सरकारे असे कदापी करणार नाहीत. कारण त्यासाठी जनतेला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य बाळगावे लागेल. अमेरिकेला कितीही नावे ठेवली तरी खुलेपणाबद्दल त्यांचा हात धरणारा अजून तरी इतर देश जगावर नाही. सामाजिक जीवनात तसेच राजकीय व्यवहारात. ज्या सहजतेने चौथीतला आमचा नातू सांगू शकतो की त्याची टीचर लेस्बीयन आहे त्याच सहजतेने तो वांशिक भेदाभेद केला म्हणून हेड मास्तरांशी भांडतो. अशा देशात प्राध्यापक मंडळींनी राजकीय क्षेत्रात पारदर्शी चित्र रेखाटावे हे साहजिकच आहे. नोम चोम्स्की ह्यांची निर्भीड अमेरिका-विरोधी भाषणे इंटरनेटवर म्हणूनच मुबलकपणे उपलब्ध असतात. त्याच परंपरेतले हे पुस्तक आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षाला अमर्याद अधिकार घटनेनेच असतात. एखादा कायद्याचा तो जेव्हा फतवा काढतो तेव्हा खुद्द त्यानेच तो मोडलेले प्रसंग त्याला कायद्याने माफ होतात. ह्याला ते "सायनिंग स्टेटमेंट्स" म्हणतात. म्हणजे नोकरीच्या आधी एखाद्याला, किंवा नटाला सिनेमाचा करार करतानाच जशी "सायनिंग अ‍ॅमाऊंट" देतात तशीच ही कायदा मोडण्याची अध्यक्षाला दिलेली माफी असते. फक्त ती त्याला जाहीर करावी लागते. अमेरिकेच्या ४२ अध्यक्षांनी मिळून बुश ह्यांच्या आधी असे एकूण ३२२ "सायनिंग स्टेटमेंटस" दिलेली आहेत असे ह्या पुस्तकातून कळते. ह्या उलट एकट्या जॉर्ज बुश (२) ह्यांनी पहिल्या सहामाहीतच ४२२ व एकूण ७५० कायदेभंगांना कायदेमाफी ह्या अधिकाराद्वारे मिळवलेली आहे. अमर्याद अधिकार असलेला अमेरिकेचा अध्यक्ष किती थराला जाऊ शकतो हे जसे ह्या टीकेद्वारे कळते तसेच आपण केलेल्या कायदेभंगाला कायद्याने माफी मिळवावी लागते ही अमेरिकेची लोकशाही परंपराही चटकन कळते व ह्या पारदर्शी पणाने ऊर भरून येतो.
ही वानगी दाखल एकच गोष्ट. अशा अनेक गोष्टी राजकारणाच्या विद्यार्थ्याला ह्या ६२० पानी पुस्तकात संदर्भासह सापडतात.
अमेरिकेची ही लोकशाहीची काळजी धन्य करणारी नक्कीच आहे.

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, १२ जुलै, २०१०

निर्भीड-१०
लेवा-ब्राह्मणी नेमाडे पंथ
आजकाल "जात" आपण अभिमानाने वागवू शकतो. ती जात नाही तोवर नोंदवू शकतो, नांदवू शकतो, निंदवू शकतो ! अर्थात ब्राह्मणांना ती लपवून बाळगावी लागते. तेव्हा सुरुवातीलाच भालचंद्र नेमाडे हे लेवा पाटील समाजातले आहेत, हे त्यांच्याच समाजाच्या संकेतस्थळावरून कळते, तेव्हा ते ब्राह्मणांवर का तोंडसुख घेत आहेत हे पटकन कळायला मदत होते. वर्णव्यवस्थेवर टीका करताना ती वाईट असून हिंदू धर्मातून जावी असे म्हणता म्हणता इतर जातींना, निदान ती जात नाही तोवर तरी, ब्राह्मणांचे स्थान आपल्याला मिळावे असे सूप्त धोरण असते. म्हणूनच तर जातीव्यवस्थेचे निर्मूलन मागण्या ऐवजी प्रत्येक जात ब्राह्मणासारखे आपल्याला "आरक्षण" मिळावे अशी मागणी करते. आता तर मराठे सुद्धा आरक्षण मागत आहेत. म्हणजे असंतुलन जातीव्यवस्थेत हवेच आहे. म्हणजे प्रत्येक जातीला ब्राह्मण जातीचा आरक्षित दर्जा वा मेवा हवा आहे. ह्यात कोणा समाजशास्त्र्यांना वाईट वाटण्याचे कारण नसावे, कारण हे फक्त जातीच्या रहाट-गाडग्याचे झोके घेणे आहे. व तसे रास्तच म्हणायला हवे.
असेच रहाट-गाडगे फिरून मूळ-पदावर येते ते "लेखकाचा लेखकराव कसा होतो" ह्या भालचंद्र नेमाडेंच्या लेखाचे. वा.ल.कुलकर्णी चालवीत तो "कंपू", नेमाडे, शहाणे, चित्रे ह्यांची मात्र "मांदियाळी" ! वा.ल.च्या गॅंगने केले ते स्वत:च्या लौकिक फायद्याचे "उद्योग" व नेमाडे करतात ती ( इंग्रजी प्राध्यापकाची ) मराठीची तळमळ, वा.लं.चा कंपू लावे ती पुस्तके म्हणजे धंदा, व नेमाडे तीस वर्षानंतर करतात ती "हिंदु"त्वाची समृद्ध अडगळ, लोकांनी आपल्या पुस्तकासाठी केलेला तो "व्यापार", तर नेमाडे देतात ती विस्तृत मुलाखत, ती मराठीला दिलेली देशी "देणगी" ! सिमल्या सारख्या थंड हवेत निरनिराळ्या भाषात होतात ती नेमाडे प्रतिभेची भाषांतरे, तर साधना करते ते आंतर-भारतीचे प्रयत्न म्हणजे साने गुरुजींच्या अपात्र चेल्यांच्या लीला !लेवा पाटील असलेल्या नेमाडेंना ब्राह्मण होते त्या वा.लं. ची जात हवी आहे हे किती स्पष्ट दिसते पहा !
असेच आहे "हिंदू"चे ! आजकाल प्रमाण-मराठीचे दिवस भरलेत, ती कोणी वाचीत नाही, आणि हेच आपले गिर्‍हाईक आहे तर भाषा निवडणे आली "बोली" ( बाझौऊन ), टीका स्वयंवराला स्थळ लाभत नाही, एक नाड येते, तर लिहा कादंबरी, तीही जाडजूड, व मालीका वाली ! यच्चयावत लेखकांना दोषून झाले, तर आता कोणावर प्रहार करायचा तर मोघम "हिंदू"वर ! प्रत्यक्षात कोणी प्राध्यापकाने विद्यार्थ्यास गळा पकडून मारले तर सिमला काय कुठेही गहजबच माजेल. मग त्याची करा आत्मवृत्त पर कादंबरी "बिढार" सारखी व चालवा आपले बिर्‍हाड ! इस्लाम वर टीका करायची म्हणजे काही खायचे काम नाही. फतव्यांची टांगती तलवार सारखी टाळावी लागते. हिंदू धर्म तसा सगळ्यात जुना व सार्‍यांनी कोरडे ओढलेला. सतीची चाल, वर्णव्यवस्था, ब्राह्मणांचे वर्चस्व, एक ना हजार बाबी टीकेच्या. हा धर्म कसा बिनधोक, कुणीही यावे, टपली मारोनी जावे. आणि हे सर्व सोयीस्करपणे, सरकारी अकादमींच्या समृद्ध अडगळीं आडून !
लेवा-ब्राह्मणी नेमाडे पंथ आता किती सुरेख दिसतो आहे, अगदी नेमाडपंथी दीपमाळे सारखा !

अरुण अनंत भालेराव
भ्र: ९३२४६८२७९२
arunbhalerao67@gmail.com

बुधवार, १६ जून, २०१०

निर्भीड-९
सार्वभौम कोण ?

तुम्ही म्हणता तसे "माध्यमांनी याबाबत जनतेला सुजाण करणे आवश्यक आहे", हे भोपाळ वायुकांडाबाबत अगदी खरेच आहे. पण ते नि:पक्षपातीपणे व्हायला हवे. मुळात हे ठसवणे जरूरीचे आहे की भारताची सार्वभौमिकता ही सरकारकडे नसून जनतेकडे किंवा राज्यघटनेत आहे. असे असताना मुळात गॅसपीडीतांची बाजू सरकारने लावून धरत कंपनीशी १२०० कोटी रु.वर तडजोड करणे हेच बेकायदेशीर आहे. हे जनतेला कळणे व माध्यमांना कळणे आवश्यक आहे. १९७१ साली संस्थानांच्या तनख्यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्वाळा दिला आहे की "राज्याची सार्वभौम सत्ता अशी काही असत नाही व ती लोकांकडे व राज्यघटनेकडे असते." आपणच सरकारे बदलतो त्यावरून हे सहजीच पटावे. असे असताना सरकारने कंपनीशी तडजोड करणे हे लबाडीचेच द्योतक आहे. वॉरन ऍंडरसनला लोकांच्या क्षोभापासून वाचवण्यासाठी खास विमानाने परत पाठविले हेच मुळी लोकांच्या क्षोभाला, मताला सार्वभौमता देते. सरकार, नोकरशाही, न्यायव्यवस्था, पोलीस ह्यासगळ्या सामान्य जनतेच्या सेवेसाठी आहेत. पण त्यांनी केवळ अधिकार आहे म्हणूण जनतेचे मुखत्यारपत्र आपल्याकडे घेऊ नये. ते बेकायदेशीर आहे. अशाच प्रयत्नांमुळे एम आय डी सी अथवा इतर खात्याने जमीनी शेतकर्‍यांकडून बळकाऊन मग कंपन्यांना देणे हे कलह वाढवते. एरव्ही जेव्हा निवडणुका जवळ असतात तेव्हा जे सरकार अफजल गुरू ला फाशी देण्याचे टाळते तेच सरकार सत्तेच्या मदाने मत्त झाल्यावर आपला स्वार्थ साधण्यासाठी सर्व हातखंडे वापरते. भोपाळ वायूकांडात सरकार हे नक्कीच एक पैसे कमावू धेंड समजल्या जाईल. आता २६ वर्षांनंतर तर हे सिद्धच होत आहे. हे सर्व प्रकरणच बेकायदेशीर म्हणून जनतेने परत न्यायासाठी झटणे अपरिहार्य आहे. बघा, माध्यमांनी, जनतेने हे जाणवून विचार करावा.

अरुण भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शनिवार, १२ जून, २०१०

निर्भीड-८
भोपाळचे रहस्य
अर्जुन सिंग बोलले तरी काय बोलणार ? आधी जे म्हणाले होते तेच त्यांना म्हणावे लागणार. राजीवचे नाव तर ते घेऊच शकत नाहीत. नाही घेतले तरी एवढा मोठा हादसा झाला आणि पंतप्रधानांना माहीतही नाही, त्यांचा काही आदेश नाही, म्हणजे असा कसा कारभार चालतोय, अशी परत बोंबाबोंब होणार.
आपली अटकळ अशी की कमीत कमी शंभर कोटी तरी कमावले गेले असतील त्यावेळी (१९८४). पण त्यापेक्षा किती तरी ज्यास्त प्रत्यही लोक कमावताहेत. आता सत्यम वाल्या राजूंचेच पहा. फार थोडयांना माहीत की त्यांची बडदास्त एका हॉस्पिटल मध्ये केली आहे व यथावकाश ते सुटतीलही. थोडाफार खर्च होईल ते गृहीत धरायचे.पदमसिंह पाटिलांचे पहा. खून करून सवरून ह्या अ-व्यवस्थेत ते सुटतीलच.
ऍंडरसनना सोडून देण्यासाठी पैसेच द्यावे लागले असतील असेही नाही. प्रत्येक व्यवस्थेत त्या व्यवस्थेला मजबूत करणारे उत्साही लोक असतातच. त्यांनीही पुढाकार घेऊन मार्ग दाखवले असतील. आपण पाहतोच की नवख्या मंत्र्यांना नियमात बसवून पैसे कसे खावेत हे नोकरदारच शिकवतात.
तर असे भोपाळचे रहस्य इतिहास जमा होत आहे. आता इतिहास उकरून काढायचा म्हणजे तसे फुरसतीचे काम आहे. बघू की सवडीने.कोणी आपण होऊन आपली मान फासात अडकवून घ्यायला आलेच तर वाहव्वा व प्रकरण अजून २६ वर्षे लोंबकळले तरीही वाहव्वा !

अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
भ्रमण: ९३२४६८२७९२

बुधवार, ९ जून, २०१०

निर्भीड-७
भोपाळचा धडा
भोपाळची वायू-गळती झाली त्यावेळी जे कलेक्टर होते ते आता म्हणताहेत की त्यावेळचे अर्जुन सिंह व त्यांच्या मुख्य सचीवाच्या सांगण्यावरूनच त्यांनी युनियन कार्बाईडच्या ऍंडरसनना अटकेतून जामीनावर सोडले. चुकीचा आदेश असेल तर तो पाळू नका असा "व्हिसल ब्लोअर"चा कायदा अमेरिकेत आहे. पण ताटाखालचे मांजर असलेले आपले अधिकारी असा कायदा केला तरी पाळणे असंभव.बोफोर्सचे कांड करणारेच राज्याचे प्रमुख असतील तर ते त्यांच्या त्यांच्या माणसांना सोडणारच. ९२-९३ च्या बॉंब स्फोटाचे एक वकील आता खाजगीत सांगतात की मेमनच्या ऑफीसमध्ये झालेला पंचनामा हा एकमेव दस्त ऐवज असा आहे की जो कोर्टापासून गाळला गेला. आता त्या ऑफीसात कोणत्या नेत्याचे चित्र होते व मेमन कोणाचा निवडणूक एजंट होता ही माहीती कळूनही काही उपयोगाची नाही. पदमसिंह पाटील अटकेत व त्यांना सोडू शकणारे गृहमंत्रीच त्यांचे पुढारी अशी यंत्रणा असल्यावर मग होणारे तेच होणार.
ह्यावर उपाय नेव्ही मध्ये पाणबुडीच्या अधिकार मांडणीत आहे. पाणबुडीचा जो मुख्य कप्तान त्याने दिलेले आदेश जर थर्ड मेटने पुनरुच्चारित केले तरच ग्राह्य धरले जातात. चुकीच्या निर्णया विरूद्ध कप्तानालाही अटक करण्याचा अधिकार थर्ड-मेटला असतो. हे थरार नाट्य एका इंग्रजी सिनेमात छान दाखवले आहे. अशी अधिकारांची मांडणी हवी. भोपाळसारख्या दुर्घटनेत पकडलेल्या ऍंडरसनला सोडण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेटलाही न देता पाच सहा जणांच्या समीतीलाच असावा. मगच त्याला सोडणे अवघड गेले असते.
असले जालीम उपायच आता कामाला येतील.


अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
भ्रमण: ९३२४६८२७९२

मंगळवार, ८ जून, २०१०

निर्भीड-६
भोपाळचा सुरमा

पूर्वी ठिकठीकाणी सुरमा नावाचे एक काजळ विकल्या जाई. हे घातल्याने दृष्टी सुधारते असे हे वैदू लोक सुरमा काही लोकांना फुकट घालून त्यांच्याकडून वदवून घेत. भोपाळचा सुरमा फार प्रसिद्ध असे. शोलेत नाही का कव्वाल सूरमा भोपाळी ! तर अजूनही भोपाळ हे सुरम्या साठीच प्रसिद्ध आहे हे सरकार दाखवून देत आहे. शिवाय ह्या भोपाळ सुरम्यावरून "सरकार" हे प्रकरण लोकांना अगदी स्वच्छ दिसू लागले आहे.

"सरकारे" नेहमी अशीच का वागत असतील बरे ? रस्त्यावर एखाद्या सायकल वाल्याशी मोटारीची टक्कर झाली असेल तर पोलीस काय करतो ? तर सायकल वाल्याला जनरल दम मारून पळवून लावतो व मग मोटारवाल्याला लायसन दाखव, सिग्नल का पाहिला नाहीस , लायसन्स वरून माणसाचे नाव, ऐपत वगैरेचा अदमास घेत हजार रुपये दंड भरायला लागेल, दारू पिऊन चालवीत होतात का त्याची टेस्ट करावी लागेल असे घाबरवून टाकणारे निर्णय तो सांगू लागतो. आणि आपल्याला तसेच मोटारवाल्याला माहीत असते की काही तरी "घेऊन" तो हे मिटवतो.
भोपाळचे वायुकांड झाले त्यानंतर एक विमान भरून अमेरिकेतले वकील भोपाळला आले होते. ते म्हणत होते आम्हाला वकील नेमा, आम्ही ह्यांच्याकडून भरपूर पैसे वसूल करू व त्यातूनच फी घेऊ. सरकारला नक्कीच ह्यात काही मिळणारे नव्हते, मग ते कशाला असे होऊ देतील. आणि झालेही तसेच. २६ वर्ष केस चालली. सगळे जण जुजबी शिक्षेवर सुटले.
आता रस्त्यावरचा पोलीस वागला असता तसेच सरकार वागले ना ? मग आपल्याला ह्याचे वाईट का वाटते ? कारण आपण अजूनही भोपाळचा सुरमा वापरलेला नाही व त्यामुळे आपल्याला अजूनही हे स्वच्छ दिसत नाही आहे.
सुरमा लो , सुरमा लो, भोपाळका !

अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
भ्रमण: ९३२४६८२७९२

रविवार, ४ एप्रिल, २०१०

निर्भीड-५
अमिताभ-सोनिया-काही घटना

सोनिया गांधी व राजीव गांधी यांचे प्रेम इटालीत जमले. तिथे राजीव गांधी विमान-चालकाचे प्रशिक्षण घेत होते. इंदिरा गांधींना भेटायला सोनियाजी पहिल्यांदा दिल्ली एअरपोर्टवर आल्या तेव्हा त्यांना घ्यायला खुद्द अमिताभ बच्चन गेले होते.
सोनियाजींच्या लग्नात नवरीला नटवणे तेजी बच्चनकडे होते. अमिताभचे जेव्हा चांगले बस्तान बसले तेव्हा त्याच्या पैशाचे व्यवहार त्याचा भाऊ अजिताभ बच्चन पाहू लागला. त्या काळी परदेशी चलनाचे नियम खूप काटेकोर होते. त्याला बगल देण्यासाटी अजिताभ व पत्नी रमोला एन आर आई झाले व लंडनला राहू लागले. अमिताभही त्या काळी युरोपात व परदेशी ठिकठिकाणी शोज करत असे.लंडनचा प्राप्तीकर चुकवण्यासाठी मग अजिताभ बहामाला राहू लागला.त्याने, हॉटेल, दुकाने व एक शिपिंग कंपनी काढली. ते सर्व नीट चालते तर तो ओनॅसिसची ( मिसेस केनेडीने नंतर ह्याच्याशी लग्न केले होते. ) तो बरोबरी करू शकला असता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अमिताभला राजकारणात आणले. अमिताभ अलाहाबादहून दणदणित विजय मिळवून लोकसभेत बसला. तेंव्हाच्या अर्थमंत्र्यांनी, व्ही.पी.सिंग, फेरा कायद्याखाली बच्चन बंधूंवर कारवाई केली. राजीवचे न ऐकल्यामुळे व्ही.पी.सिंगाची संरक्षण मंत्री म्हणून बदली झाली. मग बोफोर्स प्रकरण लोकसभेत निघाले. अमिताभने लोकसभेतून पळ काढला. दोन वृत्तपत्रांनी बच्चन बंधूंनी बोफोर्स मध्ये राजीव ऐवजी पैसे घेतले असा आरोप केला होता.त्यांच्याविरुद्ध खटला ऊभारण्यासाठी राजीवजींनी सरकारचे लंडनस्थित वकील झरीवाला ह्यांना सांगितले. खटला चालू असताना सत्ताबदल होऊन व्ही.पी. पंतप्रधान झाले. त्यांनी झरीवालांना काढून टाकले. ते भारत सरकारचे सल्लागारही होते. त्यांचे खूप नुकसान झाले.राजीव गांधींनी मग एशिया ट्रस्ट मधून काही कोटी रुपये दिले. झरिवाला केस जिंकले पण अजिताभने त्यांची फीस दिली नाही व वर झरीवालांच्या पत्नीला फूस लावली, त्यांचा घटस्फोट झाला. अजिताभचाही घतस्फोट झाला. झरीवालांची नुस्ती फीसच त्याकाळी ७५ कोटी होती व ती त्यांना केस जिंकूनही मिळाली नाही. कालांतराने राजीवजींची हत्या झाली.
आता ह्या घटनांनंतर ओळखा अमिताभशी गांधी घराण्याचे वितुष्ट का आले व ते अजून का चालू आहे ?

अरूण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२

शनिवार, ३ एप्रिल, २०१०

निर्भीड : ४

सानिया-शोएब : स्लीपींग विथ द एनेमी

जॉर्ज बुश यांचे एक प्रसिद्ध वाक्य होते की तुम्ही एकतर आमच्या बरोबर आहात, नाही तर आमच्या विरुद्ध आहात . ( यू आर आयदर विथ अज ऑर अगेन्स्ट अज ) . आता पाकिस्तान हे काही आपण आपले मित्र-राष्ट्र म्हणू शकत नाही. म्हणजे बुश-नीती प्रमाणे ते आपले शत्रू-राष्ट्रच म्हणायला हवे. मग सानिया मिर्झा पाकीस्तानी कप्तान शोएब ह्याच्याशी लग्न करणार, म्हणजे "स्लीपींग विथ एनेमी" च झाले की. अर्थात् असे लग्न करणारी ती काही पहिलीच नाही.

बर्‍याच भारतीय लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आहे, हे बर्‍याच पालकांना माहीत असेल. किंवा बरेच पालक कधी एकदा आपल्या मुला-मुलींना अमेरिकन नागरिकत्व मिळते असे झालेले असतात. पूर्वी अमेरिकन नागरिकत्वाची परीक्षा देताना व नंतर ती शपथ घेताना म्हणे असे म्हणावे लागे की भारताशी युद्ध झाले तर आम्ही अमेरिकेकडून आमच्या नातेवाईकांविरुद्ध लढू. कित्येक भारतीयांना ही शपथ घेताना अगदी रडू यायचे, पण इतर फायदे बघता सगळ्यांचा ओढा तिकडेच असायचा. आणि गंमत बघा आज वीस वर्षांनंतर ह्यांची मुले शाळेत भांडतात की तुम्ही आम्हाला भारतीय म्हणून कमी मार्क देता. म्हणजे मुले, आई-वडील कायद्याने अमेरिकन पण ते त्यांना लेखतात अजूनही भारतीय. अशीच काहीशी कोंडी सोनियाजींची झाली होती. राजीव गांधीमुळे त्या झाल्या भारतीय, पण त्यांच्यावर ठपका ठेवला गेला ईटालियन असण्याचा. त्यापायी बिचारीला पंतप्रधानपद सोडावे लागले. शरद पवारांनी ह्याच मुद्द्यावर वेगळी कॉन्ग्रेस काढली होती. नशीबाने राहूल वा प्रियांका ह्यांना लोक भारतीयच समजतात.

आता राहूल गांधी ह्यांनी समजा कोणा पाकिस्तानी मुलीशी ( उदा:बेनझीरच्या ) लग्न केले, ( अफवा अशी आहे की ते कोणा स्पॅनिश मुलीशी लग्न करणार आहेत.), तर सर्व प्रश्न आपल्याला चुटकीसरशी सोडवावे लागतील. म्हणजेच सोडून द्यावे लागतील. कारण मग "माहेरची साडी" चा प्रयोग होईल.

समजा सानिया मिर्झा डेव्हिस कप भारताकडून खेळली आणि शोएब पाकिस्तान कडून खेळला तर सामन्या आधी व नंतर आपल्याला आठवेल तोच जुना सिनेमा : स्लीपींग विथ द एनेमी !

अरुण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२

गुरुवार, १ एप्रिल, २०१०

निर्भीड :३
संगोपन किंवा मुले अशी का निघतात ?

हुशार आई-वडिलांच्या पोटी मूर्ख मुले येतात तेव्हा प्रश्न येतो की मुले अशी का निघतात ?
ज्युडिथ रिच हॅरिस ह्या विदुषीचे ह्याबाबत एक प्रसिद्ध पुस्तक आहे : नर्चर ऍझम्पशन्स ( संगोपनातली गृहिते ). काय आहेत ही गृहिते ?
हुशारी हि आई-वडिलांकडून जन्माने येते, चांगल्या संगोपनाने मुले चांगली निघतात, चांगल्या शिक्षणाने मुले चांगली निघतात. ह्या लेखिकेचे संशोधनाअंती मत आहे की असे काही असत नाही. तिच्या प्रयोगात असेही आढळले की चांगल्या शिक्षकांचाही मुलांवर काही परिणाम होत नाही. जे पालक जाणीव पूर्वक मुलांना पुस्तके वाचून दाखवितात त्यांचाही मुलांवर काही परिणाम होत नाही. हे निष्कर्ष इतके घाबरविणारे आहेत की सगळ्या पालकांनी खडबडून जागे होत हे पुस्तक वाचायला हवे.
मग मुलांवर परिणाम होतो तरी कोणाचा ? तर समवयस्कांचा किंवा पीयर्स चा. अगदी चांगले वळण लावलेले मूल शाळेत जाता जाताच दुसरे काही चांगले शिकण्या ऐवजी टगी पोरे असतात त्यांचे पाहून "च्यायला, वाट लागली, शट-अप," व ईतर शिव्या सारखे शब्द पटकन शिकतात. ज्वलंत स्वातंत्र्य सैनिकाच्या घरी त्याचीच मुले वाढदिवशी दारूची पार्टी जेव्हा मनवतात तेव्हा ते अध:पतन नसते तर तो काळाचा महिमा असतो. कारण आईटी च्या तरुणांना थोडा विरंगुळा म्हणून पार्टी करणे रास्त वाटते.मग ईतरेजनांवरही त्याचा परिणाम होतो. इथे संगोपनात काही त्रुटी राहून गेल्या अशी आई-वडिलांनी खंत करण्यापेक्षा कोणाचा कसा परिणाम होतो ह्याची शास्त्रीय माहीती घेणे ज्यास्त श्रेयस्कर ठरते. ह्या गोष्टी पटायला फारच क्रांतिकारक आहेत.
ह्या उलट असे लेखिकेला आढळले की ज्यांच्या घरात खूप पुस्तके आहेत, ती त्यांनी वाचून नाही दाखवली व मुलांनी ती नाही वाचली तरी मुलांवर खूप चांगला परिणाम होतो. हे अमेरिकेतल्या एका कौंटीला इतके पटले की त्यांनी ट्र्क्स भरभरून मुलांना पुस्तके वाटली.
रोजच्या संसारातही असेच काहीसे आढळते. सर्व सासवांना वाटत असते की माझा मुलगा माझ्या ऐकण्यातला आहे. पण सून येताच त्या समवयस्क मुलीचा त्याच्यावर इतका परिणाम होतो की तो सहजी वेगळा होतो. निदान सामाजिक कल तरी तसा आहे.

---अरूण अनंत भालेराव.
भ्र: ९३२४६८२७९२

बुधवार, ३१ मार्च, २०१०

दुतोंड़ी चिदंबरम

निर्भीड : २
दुतोंड़ी चिदंबरम

चिदंबरम ह्यानी ग्रह खाते घेतले तेंव्हा त्यांचा भर होता पारदर्शकते कड़े । मध्यंतरी त्यानी मुंबई दहशत विरोधी पोलीस दलाला काही माहीती दिली व त्या बरहुकूम के पी रघुवंशी ह्यानी कारवाई केली । इतके करूनही रघुवंशी ह्यांची उचल बांगडी झाली । कारण काय तर त्यानी प्रामाणिक पणे जी माहीती मिळाली होती ती मिडीयाला दिली । झाले साहेबांचे पित्त खवलले। स्वतःची छबी प्रामाणिक पणाची, पण इतरानी तसे न करता माझ्या सांगण्या बाहेर जायचे नाही । लोकशाही प्रणालीत वरिष्ठानी तत्वे घालून द्यायची असतात व मग ती खाल्च्यानी पालाय्ची असतात। पण लोकशाही हवीय कोणाला ?

अरुण भालेराव
९३२४६८२७९२

सोमवार, २९ मार्च, २०१०

अमिताभ आणि सोनिया

निर्भीड
अमिताभ आणि गांधी
अमिताभ कोणाला आवडत नसावा ? सोनियाजींना का राहूलला का प्रियांकाला ? एकेकाळी राजीव गांधींशी इतके मेतकूट की मुलांना घेऊन स्वित्ज़र्लंड मध्ये अमिताभ आणि त्याच्या मोठया भावाने बिर्‍हाड बसवले होते. म्हणजे आत्ताचा खुन्नस सोनियाजींचाच असणार.
का बरे असावा हा राग ? राजकारणात खरे कारण नेहमी पैसाच असते. कारण आजकाल सर्व जण राजकारण पैसे मिळविण्यासाठीच करतात ना ! आणि म्हणूनच राजकारणात नेहमी वारस म्हणून घरचाच माणूस असावा लागतो. अमिताभ सारखी गत पूर्वी कोणाची झालीय ते आठवून पहा. नटवर सिंह हे इंदिरांजींपासून खास मर्जीतले. पैशाचे सर्व व्यवहार सांभाळणारे. आणि इराक मध्ये त्यांनी परस्पर डल्ला मारला, पैसे पोचते केले नाही म्हणून त्यांचे मंत्रीपद तर गेलेच नि आता नसत्या केसेस मागे लागल्या आहेत.
तर पैसा कोणी सोडत नाही. आता सोनियाजींकडे थोडे का पैसे असतील ? पण पैशाबाबत नियम असा की जितके ज्याच्याकडे पैसे ज्यास्त तितका तो पैशाबाबत कडक. कारण पैशाची खरी किंमत गडगंज पैसेवाल्यालाच. निष्कांचनाला पैशाचे काय होय ?
तर ह्या हिशोबाने अमिताभचा राग करण्यामागे खरे कारण असणार पैसा ! बोफोर्सचा आणि इतर ठेवायला दिलेला. तो ह्याने एकतर परत केला नसणार किंवा हिशोबात गफलत असणार. बरे आता अमिताभने देतो म्हटले तरी घेण्याची जोखीम राहतेच. म्हणून परत राग ! समाजवादी पक्षाला जवळ केले, अमरसिंहांना मित्र केले, मोदींशी संबंध ठेवले वगैरे सर्व कारणे वरवरची. खरे कारण असणार बक्कळ पैसा ! आणि तोच जर भरवशाच्या माणसाने दिला नाही तर तोफेच्या तोंडीच द्यावे लागणार त्याला . हाच न्याय, हेच खरे सत्य !