marathi blog vishva

शनिवार, १२ जून, २०१०

निर्भीड-८
भोपाळचे रहस्य
अर्जुन सिंग बोलले तरी काय बोलणार ? आधी जे म्हणाले होते तेच त्यांना म्हणावे लागणार. राजीवचे नाव तर ते घेऊच शकत नाहीत. नाही घेतले तरी एवढा मोठा हादसा झाला आणि पंतप्रधानांना माहीतही नाही, त्यांचा काही आदेश नाही, म्हणजे असा कसा कारभार चालतोय, अशी परत बोंबाबोंब होणार.
आपली अटकळ अशी की कमीत कमी शंभर कोटी तरी कमावले गेले असतील त्यावेळी (१९८४). पण त्यापेक्षा किती तरी ज्यास्त प्रत्यही लोक कमावताहेत. आता सत्यम वाल्या राजूंचेच पहा. फार थोडयांना माहीत की त्यांची बडदास्त एका हॉस्पिटल मध्ये केली आहे व यथावकाश ते सुटतीलही. थोडाफार खर्च होईल ते गृहीत धरायचे.पदमसिंह पाटिलांचे पहा. खून करून सवरून ह्या अ-व्यवस्थेत ते सुटतीलच.
ऍंडरसनना सोडून देण्यासाठी पैसेच द्यावे लागले असतील असेही नाही. प्रत्येक व्यवस्थेत त्या व्यवस्थेला मजबूत करणारे उत्साही लोक असतातच. त्यांनीही पुढाकार घेऊन मार्ग दाखवले असतील. आपण पाहतोच की नवख्या मंत्र्यांना नियमात बसवून पैसे कसे खावेत हे नोकरदारच शिकवतात.
तर असे भोपाळचे रहस्य इतिहास जमा होत आहे. आता इतिहास उकरून काढायचा म्हणजे तसे फुरसतीचे काम आहे. बघू की सवडीने.कोणी आपण होऊन आपली मान फासात अडकवून घ्यायला आलेच तर वाहव्वा व प्रकरण अजून २६ वर्षे लोंबकळले तरीही वाहव्वा !

अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
भ्रमण: ९३२४६८२७९२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा