marathi blog vishva

बुधवार, ९ जून, २०१०

निर्भीड-७
भोपाळचा धडा
भोपाळची वायू-गळती झाली त्यावेळी जे कलेक्टर होते ते आता म्हणताहेत की त्यावेळचे अर्जुन सिंह व त्यांच्या मुख्य सचीवाच्या सांगण्यावरूनच त्यांनी युनियन कार्बाईडच्या ऍंडरसनना अटकेतून जामीनावर सोडले. चुकीचा आदेश असेल तर तो पाळू नका असा "व्हिसल ब्लोअर"चा कायदा अमेरिकेत आहे. पण ताटाखालचे मांजर असलेले आपले अधिकारी असा कायदा केला तरी पाळणे असंभव.बोफोर्सचे कांड करणारेच राज्याचे प्रमुख असतील तर ते त्यांच्या त्यांच्या माणसांना सोडणारच. ९२-९३ च्या बॉंब स्फोटाचे एक वकील आता खाजगीत सांगतात की मेमनच्या ऑफीसमध्ये झालेला पंचनामा हा एकमेव दस्त ऐवज असा आहे की जो कोर्टापासून गाळला गेला. आता त्या ऑफीसात कोणत्या नेत्याचे चित्र होते व मेमन कोणाचा निवडणूक एजंट होता ही माहीती कळूनही काही उपयोगाची नाही. पदमसिंह पाटील अटकेत व त्यांना सोडू शकणारे गृहमंत्रीच त्यांचे पुढारी अशी यंत्रणा असल्यावर मग होणारे तेच होणार.
ह्यावर उपाय नेव्ही मध्ये पाणबुडीच्या अधिकार मांडणीत आहे. पाणबुडीचा जो मुख्य कप्तान त्याने दिलेले आदेश जर थर्ड मेटने पुनरुच्चारित केले तरच ग्राह्य धरले जातात. चुकीच्या निर्णया विरूद्ध कप्तानालाही अटक करण्याचा अधिकार थर्ड-मेटला असतो. हे थरार नाट्य एका इंग्रजी सिनेमात छान दाखवले आहे. अशी अधिकारांची मांडणी हवी. भोपाळसारख्या दुर्घटनेत पकडलेल्या ऍंडरसनला सोडण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेटलाही न देता पाच सहा जणांच्या समीतीलाच असावा. मगच त्याला सोडणे अवघड गेले असते.
असले जालीम उपायच आता कामाला येतील.


अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com
भ्रमण: ९३२४६८२७९२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा