marathi blog vishva

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०

निर्भीड--
अमर्याद परशुराम !
कोणी तरी टोचले की ज्या समाजाचा आद्य पुरुष परशुराम आहे, त्यांना अहिंसेबद्दल बोलायचा काही अधिकार नाही. परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती, एवढीच मला माहीती होती. त्यामुळे एक अपराधीपण आले. खरे तर आमच्या वडिलांनी ब्राह्मण्याच्या कुठल्याच लौकिक खुणा आम्हाला कधी दाखवल्या नाही. आमच्या कोणाच्या मुंजी झाल्या नाहीत. एका भावाने मराठा मुलीशी लग्न केले, आणि कुठलेच धार्मिक विधी आम्ही कधी केले नाहीत. वडिलांचे वा आईचे श्राद्धही आम्ही केले नाही. तरीही आम्ही ब्राह्मण आहोत असे कोणी म्हणाले तर ते लागतेच. त्यात मला तर ह्या आद्य पुरुषाविषयीही फारशी माहीती नाही. कोण होते परशुराम ?
विनोबा भावेंच्या शब्दात ( विनोबा सारस्वत--सं: राम शेवाळकर, साहित्य अकादेमी प्रकाशन ) हा त्या काळचा सर्वोत्तम पुरुषार्थी माणूस होता. आई क्षत्रीय तर बाप ब्राह्मण. हा भयंकर पितृभक्त होता. बापाच्या आज्ञेने ह्याने आईचे डोकेच उडविले. त्याकाळच्या क्षत्रीयांचा अत्याचार सहन न होऊन ह्याने २१ वेळा युद्ध करून पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती. तरीही क्षत्रीय राहिलेच. मग ह्याने अरण्ये तोडून कोकणात वस्ती केली व लोकांना चांगले विचार, आचार व उच्चार शिकविले व तुम्ही ब्राह्मण झालात असे घोषित केले. परशुराम रामभक्त होता. रामाच्या भेटीच्या वेळी राम झाडाला पाणी घालत होता त्यावरून त्याला झाडे कुर्‍हाडीने तोडण्याऐवजी झाडे लावणे हे महत्वाचे आहे हा बोध झाला व नंतर त्याने वनस्पतीशास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्याने शोधलेल्या अवजाराला "नव परशु" असे म्हणतात व कोकणात जी फळझाडे जोपासलेली आहेत त्याचे कारणही त्याचा हा अभ्यासच असावा. आईचे डोके उडविणारा, पृथ्वी नि:क्षत्रीय करणारा हा परशुराम शेवटी शेवटी आपल्या जीवनाचे सार समुद्रासारखे प्रवृत्तींची मर्यादा हेच आहे असे म्हणतो व केलेल्या हिंसेची उपरती दाखवतो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा भक्त असलेला हा परशुराम शेवटी संदेश देतो की "ॐ नमो भगवत्यै मर्यादायै".
स्खलन झाल्यावर त्यातून शिकणे व सावरणे ह्याला खूपच मोठेपणा लागतो व म्हणूनच ब्राह्मण समाजाने अजूनही परशुरामाला आपले आद्यपुरुष म्हणून मानले असेल. ह्याच न्यायाने परशुरामाला, किंवा ब्राह्मणांना आता अहिंसेबद्दल बोलायला काहीच हरकत नसावी.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Without Fear or Favour
UnLimited Parshuram !
The other day someone teased me on my blog saying that those whose Founder is Parshuram should not talk about Non-Violence. Though the comment unsettled me, it shamed me that I even did not know enough about the Founder of Brahmins ( especially Kokanastha Brahmins) the God Parshuram. Though I know that I am Brahmin, I was not raised amongst Brahministic rituals etc. For example , none of we brothers had a thread ceremony and one of us married a non-brahmin girl. This prompted me to know more about Lord Parshuram. ( I only knew that he had attempted to kill all the Kshatreeyas on the world, 21 times ! )
Vinoba Bhave was a modern day saint more famously known for Bhoodan-Yadnya, a campaigne inviting people to donate excess farm land to the farmless and thus attempt socialism in practice. He has described Lord Parshuram in book "Vinoba Saraswat--edited by Ram Shevalkar and published by Sahitya Academy".: His mother was Kshatriya and father was a Brahmin. He was a devotee of his father and adored him so much that when he ordered him to kill his mother he beheaded her. No doubt, he was so violent. He also was a rebel and detested wrongdoings of then Kshatriya rulers. So he vowed to anihilate all Kshatriyas from the earth and led 21 campaignes to kill all of them. Later he became devotee of Lord Raam, who is epitome of Self-Control. After defeating Kshatriyas, he wanted to create a special colony of people in Konkan , which was a jungle then. With his famous weapon, the Axe, he deforested konkan extensively and rehabilitated the victims there. He taught them good values and the scriptures and declared all these people as Brahmins. When he met Lord Raam, he observed that while talking to him Lord Raam was watering and tending a plant. This created an awareness in him for taking care of the plants and environment. He studied plants and invented a tool "Nav Parashu" after him. After such extreme measures undertaken in his life he realised the wisdom of self control and gave a message to his people that we should be like a sea, which does not cross its given limits. This message he gave through a mantra "Oum namo bhagawate maryadayye", meaning honour the limits or self control or don't go to extremes.
Having committed lot of violence, Lord Parshuram realised the value of non-violence and virtues of self control. It requires lot of guts and courage to experiment, realise the wrong and correct the behaviour and it may be because of this rare quality that he is still considered the Founder of Brahmins .
Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०१०

निर्भीड--
अमर्याद परशुराम !
कोणी तरी टोचले की ज्या समाजाचा आद्य पुरुष परशुराम आहे, त्यांना अहिंसेबद्दल बोलायचा काही अधिकार नाही. परशुरामाने २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती, एवढीच मला माहीती होती. त्यामुळे एक अपराधीपण आले. खरे तर आमच्या वडिलांनी ब्राह्मण्याच्या कुठल्याच लौकिक खुणा आम्हाला कधी दाखवल्या नाही. आमच्या कोणाच्या मुंजी झाल्या नाहीत. एका भावाने मराठा मुलीशी लग्न केले, आणि कुठलेच धार्मिक विधी आम्ही कधी केले नाहीत. वडिलांचे वा आईचे श्राद्धही आम्ही केले नाही. तरीही आम्ही ब्राह्मण आहोत असे कोणी म्हणाले तर ते लागतेच. त्यात मला तर ह्या आद्य पुरुषाविषयीही फारशी माहीती नाही. कोण होते परशुराम ?
विनोबा भावेंच्या शब्दात ( विनोबा सारस्वत--सं: राम शेवाळकर, साहित्य अकादेमी प्रकाशन ) हा त्या काळचा सर्वोत्तम पुरुषार्थी माणूस होता. आई क्षत्रीय तर बाप ब्राह्मण. हा भयंकर पितृभक्त होता. बापाच्या आज्ञेने ह्याने आईचे डोकेच उडविले. त्याकाळच्या क्षत्रीयांचा अत्याचार सहन न होऊन ह्याने २१ वेळा युद्ध करून पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती. तरीही क्षत्रीय राहिलेच. मग ह्याने अरण्ये तोडून कोकणात वस्ती केली व लोकांना चांगले विचार, आचार व उच्चार शिकविले व तुम्ही ब्राह्मण झालात असे घोषित केले. परशुराम रामभक्त होता. रामाच्या भेटीच्या वेळी राम झाडाला पाणी घालत होता त्यावरून त्याला झाडे कुर्‍हाडीने तोडण्याऐवजी झाडे लावणे हे महत्वाचे आहे हा बोध झाला व नंतर त्याने वनस्पतीशास्त्राचा सखोल अभ्यास केला. त्याने शोधलेल्या अवजाराला "नव परशु" असे म्हणतात व कोकणात जी फळझाडे जोपासलेली आहेत त्याचे कारणही त्याचा हा अभ्यासच असावा. आईचे डोके उडविणारा, पृथ्वी नि:क्षत्रीय करणारा हा परशुराम शेवटी शेवटी आपल्या जीवनाचे सार समुद्रासारखे प्रवृत्तींची मर्यादा हेच आहे असे म्हणतो व केलेल्या हिंसेची उपरती दाखवतो. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचा भक्त असलेला हा परशुराम शेवटी संदेश देतो की "ॐ नमो भगवत्यै मर्यादायै".
स्खलन झाल्यावर त्यातून शिकणे व सावरणे ह्याला खूपच मोठेपणा लागतो व म्हणूनच ब्राह्मण समाजाने अजूनही परशुरामाला आपले आद्यपुरुष म्हणून मानले असेल. ह्याच न्यायाने परशुरामाला, किंवा ब्राह्मणांना आता अहिंसेबद्दल बोलायला काहीच हरकत नसावी.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

बुधवार, २० ऑक्टोबर, २०१०

देशीवादाचा वृद्धाश्रम
एकेकाळी नेमाडे देशीवादासाठी फार प्रसिद्ध होते. देशीवाद तसा दिसायलाही खूप लोभस असे. पण आज तो कुठे आहे ?
वृद्धाश्रमात जशा सर्वांच्याच कहाण्या साधारण एकसारख्याच असतात तसेच काहीसे नेमाडेंच्या देशीवादाचे झाले आहे.
नेमाडे स्वत: आजकाल भाषणातून मराठीच्या काळजीपायी मुलांना फक्त मराठी माध्यमांच्या शाळातच पाठवा असे म्हणतात. पण ह्यांचे स्वत:चे शिक्षण इंग्रजी ह्या विषयाचेच झाले आहे. देशीवादासंबंधी टीकास्वयंवरात (पृ.१२२) वर ते म्हणाले होते :"आता आपल्या स्वत:च्या भाषासमूहाबाहेर आपण जे जे भाषिक वर्तन करतो त्याला सामान्य दर्जापलीकडे काही महत्व नसते." त्यानंतर ते स्वत:च्या पुस्तकांची इंग्रजीत भाषांतरे करून घेणार्‍यांची खिल्ली उडवतात. पण प्रत्यक्षात साहित्य अकादेमीच्या पुरस्कारांसाठी त्यांना आपल्याच पुस्तकांची भाषांतरे करून घेणे क्रमप्राप्त ठरते. आता हे वृद्धाश्रमातल्या कहाण्यांसारखेच झाले की !
नेमाडेंच्या "हिंदू" कादंबरीची वाखाणणी करण्यात सध्या एक नवी टूम चालू आहे. हरिश्चंद्र थोरात हे एक कार्यशाळा घेऊन हे सिद्ध करू पाहत आहेत की मिखाइल बख्तिन नावाच्या रशियन समीक्षकाच्या "द डायलॉगिक इमॅजिनेशन" ह्या पुस्तकात दिलेल्या निकषांवरून "हिंदू" ही कादंबरी ही अनन्यसाधारण ठरते. ( म्हणजे हिला मोठ्ठा अकादेमीचा सन्मान द्यावा !). आता स्वत: नेमाडे टीकास्वयंवरात म्हणून गेले आहेत ( पृ.१२३) की "आपण निर्माण केलेली प्रमाणके सोडून इतरांच्या प्रमाणकांचा स्वीकार करता कामा नये". शिवाय मालशे म्हणतात तसे बख्तिन हा काही हिंदू गृहस्थ नव्हता, त्याची प्रमाणके गृहित धरायला.
जे नेमाडे म्हणाले की "पाश्चात्य वेशभूषेचे अनुकरण करणार्‍या पुरोगामी आंतरराष्ट्रीय जीवनपद्धती जगणार्‍या शिक्षितांनी मात्र हा सर्वात सौंदर्यशील जुळणभाग परसंस्कृतीच्या दबावामुळे लज्जास्पद ठरवला" , त्यांना कधी कुणी धोतर कुडत्यात पाहिले आहे काय ? आजकाल तर ते सहा महिने कॅनडा व सहा महिने दहिसर असे रहात असतात. आता ह्यांची तिथली नातवंडे कुठल्या माध्यमाच्या शाळेत जात असतील ते सहजी कल्पना करण्यासारखे आहे. शिवाय "हिंदू" त ते गा‍र्‍हाणे घालतात की तिथे व्हिसा संपला की हाकलून देतात, हे काय बरे आहे का ? तसेच खेडयात राहण्याच्या देशी भावनेचे . स्वत: ते शहरात रहात आले आहेत. पण गुण गायचे खेडयात राहण्याचे.
"हिंदू" कादंबरीत देशीवादाच्या तत्वाविरुद्ध किती तरी उदाहरणे बघायला मिळतात. ज्या गालिबच्या शेरशायरीचे नेमाडेंना खूप अप्रूप आहे, ते काय मराठीत आहेत काय ? तसेच हिंदी सिनेमांच्या गीतांचे उदधृत करणे. मराठी सिनेमात काय गाणी नसतात काय ? तसेच सध्या इंग्रजी कादंबर्‍यात प्रचलित असलेल्या एका युगतीचे. उदाहरणार्थ मायकेल क्रिष्टन ह्यांच्या कादंबर्‍यात कथानकाच्या अनुरूपतेने खूप तांत्रिक माहीती वाचकांना दिलेली असते. जसे जुरासिक पार्क वगैरे. आता हा परदेशीच कल म्हणायचा. मग "हिंदू" त जी भरताड भरती अशी केलीय तिला काय म्हणायचे ? जसे ऍंथ्रॉपॉलॉजीचा एक किस्सा की माणूस आडव्याचा उभा झाला म्हणून भाषेचा जन्म झाला व तो जर पुन: चार हातापायावर रांगायला लागला तर भाषा नष्टही होईल. तसेच वाघ नष्ट होण्याची गोष्ट. गरम तव्याचा जोक, बोबड्या प्राध्यापकाचे बोलणे, स्त्री-दाक्षिण्य हे दक्षिणेच्या लोकांनी आणलेले वैशिष्ट्य त्याचा किस्सा, काही पोरकट कविता, नामांतराचा इतिहासात जमा झालेला सविस्तर भाग, विद्यापीठातले भ्रष्टाचाराचे रडगाणे, वगैरे. म्हणजे पहा, स्वत:च अशी अडगळ पेरायची व छदमीपणे रडायचे कशावर तर "जगण्याची समृद्ध अडगळ". ती ही "हिंदू" धर्मामुळे !
देशीवाद जसा स्वत: नेमाडेंनीच अशा अडगळीच्या वृद्धाश्रमात लोटला आहे तशीच ही कादंबरी अडगळीत व वृद्धाश्रमातच आता पहायला मिळेल !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

प्रती ज्ञानेश्वर नेमाडे,--ज्ञानेश्वराला काय दाखवतात ?
"हिंदू" ह्या प्रचंड खपलेल्या भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कादंबरीतले पृ.१५६ वरचे हे भाष्य पहा:
"एक बुला वेसकर. वेशीखालच्या देवडीत बसलेला. हा ह्याच नावानं विख्यात होण्याचं कारण आजूबाजूला कोणी नाही, हे चाणाक्षपणे पाहून हा एकदम त्याच्या धोतरातली बुल्लीच मुठीत धरून आम्हा पोरांना दाखवायचा. पुन्हा धोतर खाली टाकून साळसूद चेहर्‍यानं काहीच झालं नाही, किंवा काहीच केलं नाही, असं दाखवायचा. हे कोणाला सांगायचं तरी कसं ? याचा अर्थ आपल्याला तेव्हा लागत नव्हता. आता लागतो: सवर्ण हिंदू -अस्पृश्य संबंधाचा तो दृष्टांत होता, कव्हणी एकु कुरवंडी करीत सांता कुरघोडी करी त्या वेसकरीयाचा दृष्टांत. जैसे फ्राइडचा सिद्धांत जातीयतेत मोडून सांगितल्यास जैसे होईल तैसे. किंबहुना ज्ञानेश्वर : ऐसा शिवमुष्टिगुंडु । घेउनु ठाके ॥ अस्पृश्यता एक हजार वर्षांपासून आहेच, तेव्हापासूनचे दाब असे वर येतात. "
ही संत ज्ञानेश्वरांची अतिशय हीन पातळीला जाऊन केलेली बदनामी आहे.
"संतसूर्य तुकाराम" कादंबरीत तुकारामाने तरुणपणी दुकानात आलेल्या पोरींच्या हातावर गोळी ठेवण्याच्य़ा मिषाने स्पर्श केला ( व इतर स्त्रिसुलभ आकर्षण दाखवले ) तर केवढा गहजब झाला. संमेलनाध्यक्षपदही गेले आनंद यादवांचे आणि इथे तर लेखक ह्या वेसकराला ज्ञानेश्वरांना हे काय भलतेच दाखवायला लावतोय. व वर परत फ्राइडचा सिद्धांत, दृष्टांत वगैरे. ह्याचा धिक्कारच व्हायला हवा.
कायदेशीर कारवाईही व्हायला हवी.
कादंबरीतले लिखाण हे प्राय: एक ललित लिखाण व काल्पनिक असते. पण नेमाडे कबूलतात की ही आत्मचरित्रपर कादंबरी असून आदर्श अशा "यमुनापर्यटन" टाइप कादंबरीत असते तसे निश्चित नैतिक भूमिका घेऊनच हे चितारलेले आहे. नेमाडे म्हणतात: "व्यक्ती व समाज ह्यांच्या संबंधात अनेक प्रश्न असतात व ह्या संदर्भात काही निश्चित नैतिक भूमिका घेऊन कादंबरीकाराने भाषिक कृति केलेली असते, त्यानुसार आशयसूत्र निवडलेले असते." ( टीकास्वयंवर--पृ २४२ ). शिवाय कादंबरीच्या प्रमोशन मध्ये नेमाडेंनी स्टार माझा वर जी प्रदीर्घ मुलाखत दिली त्यातही म्हटले होते की हिंदू धर्म ब्राह्मणांनी बिघडवला. त्यामुळे जे लिहिले आहे ते पूर्ण समजून-उमजून , निश्चित नैतिक भूमिकेतूनच लिहिलेले आहे. शिवाय फ्राइड व खुद्द ज्ञानेश्वरांच्या काही ओळी उदधृत करून ते असे मांडत आहेत की ही ब्राह्मणांनी केलेल्या अत्याचारावरची ही रास्त प्रतिक्रिया आहे. जसे काही खुद्द ज्ञानेश्वरांच्या ओवीमधूनच हे सिद्ध होते.
ही जाणून-बुजून केलेली चतुराई व बदनामी आहे.ज्ञानेश्वरीच्या अध्याय १३ त ओवी ७१५-७१७ मध्ये विद्या व वय ह्यांच्या उन्मादाने माणुस कसा गर्व करीत छाती काढून चालतो व माझ्यासारखा मोठा कोणी नाही असा शिवभक्तांना असतो तसा गर्व ( शिवमुष्टीगंडु, गुंडु नव्हे) धारण करतो व मग त्याला चांगले बघवत नाही अशा अर्थाच्या ह्या ओव्या मुळात अशा : म्हणे मीं चि येकु आथि । माझा चि घरिं संपत्ति । माझी आचरती रीती । कोण्हासी नाही ॥ नाहिं माझे नि पाडे वाडु । मी चि सर्वज्ञु एकु रूढु । ऐसा शिवमुष्टिगंडु । घेउनु ठाके ॥ व्याधिलेया माणसा । न ये भोगु दाखवुं जैसा । नीके न साहे तैसा । पुढिलाचे ॥ आता ह्य़ात वेसकराने काय दाखवले त्याचा व का दाखवले त्याचा हा कसा काय दृष्टांत होतो.
शिवाय ह्या वेडसर वेसकराने धोतर उचलून जे दाखवले ते लेखक म्हणतो तसे "आम्हा पोरांना". त्यात महानुभावी पंथाचे लेवा पाटील नेमाडे व त्यांचे ब्राह्मण नसलेले मित्र आहेत. त्यामुळे हा दाब असलाच तर कुणब्यांच्या विरुद्धचा आहे. ब्राह्मणांच्या किंवा ज्ञानेश्वरांच्या विरुद्धचा अजिबात होत नाही. लेखक हेच पुढे कबूलतो ते असे : "शेतकर्‍यांनी कष्ट करावेत आणि ह्या लोकांनी कणसं खुडून न्यावी ? काय नीतीच्या गोष्टी करता हो. ...शेवटी कुणब्याकडेच खेटे घालतील ना ? " दलित व कुणब्यांमध्ये हे लावून देणेही वाईट व निषेधार्यच आहे. कदाचित दलितांच्या लक्षात ही गोष्ट येईलच.
प्रति-ज्ञानेश्वर नेमाडेंना एकमेवाद्वितीयतेचा गर्व जरूर व्हावा पण ते माउलींचा असा अपमान करू शकत नाहीत.
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१९

नीतीची उत्क्रांती

सगळ्यांचा असा समज आहे की अमेरिकेत पैसा हेच सर्वस्व असून त्यामागेच ते धावताहेत. वॉल स्ट्रीट जर्नल हे तर बोलून चालून शेअर्स वाल्यांचे. आणि त्यात "उत्क्रांतीच्या मानस शास्त्रा " संबंधी इतकी सखोल बातमी, चर्चा यावी हे खूप आश्चर्याचे आहे.

बातमी अशी की कोणी प्रोफेसर, मार्क हाउझर नावाचे, हार्वर्ड विद्यापीठात होते. ते शिकवीत उत्क्रांतीचे मानसशास्त्र. ह्यात त्यांना असे दाखवायचे होते की माणसाचे नीतीमत्तेचे विचार हे निसर्गत: उत्क्रांत झाले आहेत व ते वैज्ञानिक पद्धतीने आपण मांडतो आहोत असे दाखवण्य़ासाठी त्यांनी काही माकडांवर प्रयोग केले व त्यातून नीतीमत्तेचे विचार कसे उत्क्रांत झाले आहेत, हे साधार दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता इथवर तरी काही वावगे वाटत नाही. पण पुढे म्हटले आहे की त्यांना विद्यापीठाने तीन वर्षांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर, अवैज्ञानिक पवित्रा बाळगल्याबद्दल,दोषी ठरवले आहे. ते सध्या एक वर्षाच्या रजेवर गेले आहेत. म्हणजे जवळ जवळ काढूनच टाकल्यासारखे.

अशा काय माकडचेष्टा ह्या महाशयांच्या अंगलट आल्या ? तर असे कळते की त्यांनी माकडांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहिजे तशा प्रयोगात बदलवून घेतल्या, त्या खर्‍या नव्हत्या. हार्वर्ड विद्यापीठाची ही फारच काटेकोर वैज्ञानिक जाणीव आपल्याकडे तर धसकाच आणणारी वाटेल. आपण पीएचड्यांचे प्रबंध चोरून डॉक्टर करतो आणि इथे एका प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाला प्रयोगात खोडसाळपणा केल्याबद्दल इतकी दखल ! बरे ह्या गृहस्थांचे बर्‍यापैकी नाव आहे, "मॉरल माइंडस" नावाचे एक पुस्तक गाजलेले आहे, इंटरनेट वर "मॉरल सायन्स टेस्ट" नावाची एक टेस्ट ह्यांची प्रसिद्ध आहे ( सध्या ती काढलेली आहे ) आणि हे बर्‍यापैकी गाजलेले आहेत. पण नुसते त्यांनी आपले मत म्हणून हे मांडले असते तर मानसशास्त्रासारख्या कलाविषयात हे धकण्यासारखे होते. पण त्याचे शास्त्र करायचे, प्रयोग करायचे व त्यात खोटेपणा करायचा ह्याने हार्वर्डसारख्या विद्यापीठाला नक्कीच बट्टा लागल्यासारखे आहे. विज्ञानाची इतकी मानमराबता वाखाणण्यासारखी तर आहेच, शिवाय अर्थव्यवस्थेने इतके त्रस्त केलेले असताना वॉल स्ट्रीट सारख्या वर्तमानपत्राला ह्या बातमीचे अप्रूप वाटावे व ते त्यांनी सविस्तर समजून सांगावे ही सुद्धा अपार कौतुकाची बाब आहे.

पैशासाठी पदोपदी नीतीमत्ता पायदळी घेणार्‍या अमेरिकेला आपली नीतीमत्ता कशी बनते ह्याचा अभ्यास शास्त्रीय काटेकोरपणे व्हावा असे वाटावे हीच खूप महान नीतीची गोष्ट आहे व त्यासाठी त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे !

अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Nirbheed Vha----19 ( Be Bold ! )

Valuing Evolutionary Psychology

We presume that whole America is in hot pursuit of money and wealth. And Wall Street Journal, as the name suggests should be all about money. On such a background it is refreshing thought to see that it has given such a prominant space for a news about Evolutionary Psychology.

The news is about virtual sacking of one professor, Mr. Marc Hauser, of Harvard University, for his scientific misconduct on eitht counts. The professor has already confessed of a "mistake" and has proceeded on one years leave of absence. This professor was quite popular in Psychology circuit through his book "Moral Minds: How Nature designed our universal sense of right & Wrong" and various tests on internet. What the professor was trying to do in the university through research on monkeys is that our sense of morals has been developed through the evolution and it does not owe the pressures from relijgion, society or reason. While managing the experiments, it turned out that he manipulated the reactions of the monkeys to suit the conclusions, which is a moral sin in Science. What is so noteworthy in the episode is that while the natiion is going through economic and social turmoil, the newspaper values the upkeep or morals of Universily, thereby nurturing the scientific fabric in the society. All the kudos to the Wall Street Journal and Harvard University for such high standards !

When in everyday pursuite of money, in various walks of life, we find the scant attention we give to morals and its evolution, it is so heartening to see that the newspaper has taken lot of space and efforts in explaining why morals have to be kept upright whether they are evolved through nature or otherwise !


Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१८

कंपन्या व सामाजिक बांधीलकी

इथले एक प्राध्यापक श्री.अनील करनानी ह्यांनी वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या मते कंपन्यांना फायदा कमावणे हाच एकमेव हेतु असतो व सामाजिक बांधीलकी वगैरे सब झूट असते.

जगातले सर्वात श्रीमंत गृहस्थ श्री.बिल गेट्स ह्यांचे उदाहरण घेतले तर एक गंमत पहायला मिळते. अवघ्या १६/१७ व्या वर्षी कॉलेज शिक्षण सोडून संगणक कंपनी हा मुलगा सुरू करतो, पेटून एका ध्यासापायी जगातला अव्वल श्रीमंत होतो, आणि आता स्वत:च्या मुलांसाठी अगदी मोजकी संपत्ती ठेवून, जगातला सर्वात मोठ्ठा दानशूर होतो. भारतात दारिद्र्यनिर्मूलनाचे व एड्सचे ह्यांचे प्रचंड कार्य चालते. जेव्हा ते कंपनी चालवीत होते तेव्हा संगणक हेच त्यांचे सर्वस्व होते. इतके की ते सहकार्‍यांवर ओरडत की इतका मूर्खपणा मी कधी पाहिला नाही, किंवा कंपनीचे ऑप्शन्स विकून तुम्ही जागतिक शांतता पथकात का नाही सामिल होत ? हाच गृहस्थ आता म्हणतो की सर्व जीवांना समान मान मिळायला हवा व सर्वजण माझे बरोबरचे भागीदार आहेत. आणि इतके करूनही ते आता जरी निवृत्त झालेले असले तरी त्यांच्या अध्यक्षतेखालची त्यांची कंपनी प्रचंड नफा कमावणारीच म्हणून ओळखल्या जाते.

जरी त्यांचे शिक्षण त्यांना अर्धवट सोडून द्यावे लागले तरी अजूनही संगणक व विज्ञानात त्यांचा अभ्यास प्रचंड ताकतीचा असून त्याबद्दल त्यांना जागतिक मान सदैव मिळत असतो. ते राहतातही फार साधेपणाने. श्रीमंतांचे राहणे आपण टीव्हीवर कौतुकाने पहात असलो तरी ह्यांचे साधे राहणे लोकांना मोह घालते. आता जाणवणारी त्यांची सामाजिक बांधीलकी ही खरी म्हणायची की अजूनही कंपनी व्यवहारातली ह्यांची नफेखोरी खरी समजायची हा पेच आपल्याला पंचायतीत टाकतो.

भारतातल्या प्रत्येकाला सदरा मिळेल तेव्हाच मी शर्ट घालीन असे सामाजिक बांधीलकीने व्रत पाळत जन्मभर उघडे राहणारे गांधीजी ह्यांना आपण ह्या बांधीलकीच्या सन्मानार्थच "महात्मा" म्हणतो. असे महात्मापण बिल गेट्स ह्यांना मिळणारे नसले तरी त्यांची आत्ताची सामाजिक बांधीलकीची जाणीव आपण थोटी ठरवू शकत नाही.

शेवटी समाज हा एखाद्या जगन्नाथाच्या रथासारखा असतो. तो सर्वांनाच ओढायचा असतो. काही जण खूप जोर लावतात पण त्याने रथाची गती तेव्हढीच राहते, तुम्ही बिडी-काडी साठी क्षणभर बाजूला उभे राहिलात तरी रथ चालूच असतो. फक्त तुम्ही त्याच्या मार्गात सुरुंग पेरू नयेत, पाचरी मध्ये मध्ये घालू नयेत म्हणजे झाले. गरीब शेतकरी कर्जाच्या बोझ्या पायी आत्महत्या करतो, पण कृषी मंत्र्याच्या मालमत्तेला हात लावीत नाही, ह्यात गरीबांची सामाजिक बांधीलकी ज्यास्त दिसून येते, व कृषीमंत्र्यांना सारखे माझी मालमत्ता कशी नाहीय, असे सांगत राहावे लागते त्यात त्यांच्या नसलेल्या बांधीलकीचे दर्शन होते. उद्या जर कृषीमंत्र्यांनी बिल गेट्स सारखा मोठ्ठा निधी उभारला तर जरी शंभर उंदीर खाऊन झाल्यावर हजला निघालेल्या मांजरीसारखे ते भासले तरी आपल्याला त्यांची बांधीलकी मानावीच लागेल. पण तोपर्यंत आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याच्या, कायदा हातात न घेण्याच्या सामाजिक बांधीलकी बद्दल सर्वांनाच ऋणी राहावे लागेल. जगातल्या गरीबांची अशी सामाजिक बांधीलकी, हेच जगातल्या श्रीमंतांचे रहस्य आहे. कंपन्यांना आपण भरपूर नफा करू देतो ह्यात गिर्‍हाइकांची सामाजिक बांधीलकी आहे. कंपन्यांची नव्हे !

अरूण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

Nirbheed vha---18

Companies & their Social Responsibilities

Mr.Anil Karnani has opened up a controversy over companies not having social responsibilities and how that is necessary for efficiency, in an article in recent Wall Street Journal.

When we look at the richest man Mr.Bill Gates, it makes an interesting situation. When he was running the company, which he founded at an early age, he was passionate about the computers, innovation and maintaining the lead in the trade. Now he is not only the richest man, but a great philanthropist, and talking about only social responsibility. He was so ruthless when he was leading the company that he used to tease his subordinates by demeaning remarks such as : "This is the stupidest thing I have ever seen, or Why don't you sell your options and join the peace core ?" And now, he proudly declares that his guiding principle is humility, equal honour for everybody and treating everybody as respected colleague. We are at a loss to understand whether his passion for profits was paramount or his social outlook is laudable now !

When Gandhiji decided to shun the shirt till everybody gets one to wear, we very clearly see the ultimate and pure social responsibility without any shades . Perhaps that is why we call him "Mahatma" for the same.

Society, I think, is like a Jagannath's Chariot. Everyone is required to pull it. Those who pull it with full fury and passion still can't make it gallop greatly and those who take a little bit of rest from pulling it, does not slow it down. Only thing is that keeps at a normal speed unless someone does not spread mines underneath or put wedges in its path.

Farmers who committ suicide due to poverty, instead of thinking snatching part of the properties of the Agriculture Minister, show in fact a remarkable sense of social responsibility which the Agriculture Minister lacks when he has to take pains in convincing that he does not own huge properties. If he makes a huge fund for farmers as comparable with Bill Gates , then even if it appears as the cat going to Haj after eating hundred rats, we may have to concede social responsibility to the Minister. But till then the farmers suicides ( and not snatching properties forcibly ) should paint the social responsibility of theirs,in bold colours. In fact, this could be the secret of all rich people that the poor show their social responsibility by allowing them to become rich. Companies do prosper at the cost of willing customers and it is their(customers') social responsibility that we should praise !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com

रविवार, २२ ऑगस्ट, २०१०

निर्भीड व्हा---१७

मंदीर यही बनायेंगे !

बाबरी मस्जीद-राम मंदीर प्रकरण ऐकले की अमेरिकेतले लोक आपल्याला हसत असत. त्यांना वाटे एवढया पुढारलेल्या काळात काय हे लोक धर्माचा बाऊ करून बसताहेत. पण आता त्यांचाच मटका बसलाय. कारण ज्या वर्ल्ड ट्रेड सेंटरला आतंकवाद्यांनी जमीनदोस्त केले त्याच झीरो ग्राऊंडवर मशीद उभारण्याचा प्रस्ताव मुस्लिम समाजाकडून आला आहे. अगदीच त्याच जागी नसले तरी दोन कि.मी. अंतरावर मशीद व इतर स्मारक म्हणजे अमेरिकेच्या सहनशीलतेची कसोटीच आहे.

अमेरिकेचे नवीन अध्यक्ष बराक ओबामा हे मधल्या नावाने मुसलमान आहेत ह्याचा अमेरिकेला भारी अभिमान होता. त्यात मुस्लिम समाजाशी सौजन्याचे धोरण ठेवत ओबामांनी पहिलेच भाषण कैरोत करीत जे सौहार्दाचे आवाहन केले ते तर फारच प्रभावी होते. आता हेच आवाहन त्यांच्या अंगलट येत आहे. ज्या मुल्लाने एकेकाळी सीआयए ला मदत केली तोच आता ह्या मशीदीसाठी परवानगी मागतो आहे व मुस्लिमांच्या द्वेषाला अमेरिकाच जबाबदार आहे असे म्हणतोय. म्हणजे परत तो ज्यास्त प्रभावी धार्मिक बनला आहे. आता अमेरिका म्हणते आहे की तुम्हाला तुमची मशीद उभारण्याचा हक्क जरूर आहे पण इथेच का, व ह्यामागे कोणाचे पैसे आहेत तेही पाहिले पाहिजे.

ह्यासंदर्भात अयान हिरसी अली ह्या विदुषीचे मत आहे की तुम्ही कितीही आव आणलात तरी हटिंग्टन ने म्हटल्यासारखे मुस्लिम व ख्रिश्चन ह्या दोन संस्कृतींचाच हा लढा आहे. क्लॅश ऑफ सिव्हिलाइझेशन्स . अयान हिरसी अलीचे नोमॅड नावाचे स्वानुभाववरचे एक पुस्तक नुकतेच आले आहे. त्यात ती आफ्रिकेतून अमेरिकेपर्यंत कशी लढत आली व स्त्रियांवर अजूनही मुस्लिम समाजात कसे अत्याचार होताहेत ह्यासंबंधी अनुभवाचे बोल आहेत. तिच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेतले सुधारलेले मुस्लिमही कोवळ्या मुलींची बेधडक सुन्ता करतात, फक्त कबूल करीत नाहीत. तिने एका ख्रिश्चन मिशनर्‍याला म्हटले आहे की तुम्ही भले धर्मांतरे नका करू पण मुस्लिम समाजाला जरा मवाळ करण्यासाठी ठोस व ठाम पावले उचलायला हवीत. नाही तर मुस्लिम समाज असाच धर्मवेडा राहील.

ग्राऊंड झीरो जवळ मशीद का नको त्याचे दृश्य कारण हे लोक असे देतात की धार्मिक सामंजस्याचे प्रतीक वाटण्यापेक्षा इस्लामच्या हिंसेच्या विजयोन्मादाचे ते ज्यास्त प्रतीक ठरेल. लॉस एंजेल्सला एक म्युझियम आहे, "सिमोन विझेंथॉल" ह्यांच्या नावाने. हे आहे म्युझियम ऑफ टॉलरन्स, सहनशीलतेचे संग्रहालय. तशी सहनशीलता आजकाल संग्रहालयात ठेवण्याचीच वस्तु झाली आहे. आपण पाहतोच की व्यवहार्य कारणांसाठी युरोपात सुद्धा अनेक ठिकाणी बुरख्यावर बंदी आणली आहे कारण धर्मापेक्षा स्त्रीला मानाचे प्रतीक करणे त्या त्या सरकारांना ज्यास्त महत्वाचे वाटते.

अमेरिकेत व्यवहारी असण्याला ज्यास्त महत्व आहे. सध्या कॅलिफोर्नियात एक प्रपोजल २३ नावाचे विधायक मतदानासाठी येत आहे. पूर्वी कबूल केलेले पर्यावरणाचे आकडे तूर्त बेकारी सुधरेपर्यंत लागू होऊ नयेत नाही तर उद्योग परत बाहेर जातील असा हा प्रस्ताव आहे व बर्‍याच मोठ्या कंपन्या ह्यासाठी करोडो खर्च करीत आहेत. म्हणजे पहा पर्यावरणाच्या विरुद्ध जाताना अमेरिकेला काही वाटत नाही कारण ते त्यांच्या व्यवहाराचे आहे.

भारतासाठी तर हे फारच महत्वाचे धोरण ठरावे. कारण भारतात मुस्लिम व हिंदू हाच संस्कृतींचा झगडा आहे. आणि हिंदू त्यांच्यातल्या असंख्य प्रवाहांमुळे फारच मवाळ तर मुळातच मुस्लिम ज्यास्त धर्मवेडे. मुस्लिमांच्याच भल्यासाठी हिंदूंनी ज्यास्त धर्मकठोर होणे जरूरीचे आहे. अर्थात त्यांची (मुस्लिमांची ) आर्थिक स्थिती, नोकरी व्यवसाय, संबंधी उदारमतवादी धोरण ठेवावेच लागेल. पण धार्मिक बाबीत हिंदूंनी आग्रही होणे आवश्यक ठरणारे आहे.

त्यासाठी बाबरी मस्जीद प्रकरणात माघार न घेता ठणकाऊन "राम मंदीर"चा मुद्दा लावून धरायला हवा, त्याच्याशिवाय मुस्लिम मवाळ होणार नाहीत, असे अमेरिकेतले उदारमतवादी धोरण पाहता वाटायला लागले आहे. इथले जनमत वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ मशीद होऊ देण्याच्य़ा पार विरुद्ध आहे व ते तसे ठणकावून सांगू लागले आहेत. मुस्लिमांना मवाळ होण्याचा हा चांगला मार्ग आहे !

अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com


Nirbheed Vhaa---17

Raam Mandir Due to America !

Americans used to laugh at our age old issues of Babri Masjid--Raam Mandir thinking that we are not sufficiently secular as they think they are. But things are turning topsy turvy for them. A proposal for a Masjid near the ruins of World Trade Center ( Ground Zero ) has come up and has become the talking point all over America. And it is slowly revealing the thin veil of Secularism that America is presently wearing .
America, no doubt, accepts that Muslims have a right to have their place of worship wherever they want but having it so near to ground zero does not meet with their approval. Though the Mulla concerned was so friendly at one time that he used to help CIA but now they are questioning the sources of funds and the propriety of having the Masjid so near to Ground Zero. Now perhaps it is the rest of the world's turn to see the true colours of American Secularism.
In this context the views of Ayaan Hirsee Ali are quite interesting. She is presently in news due to her recent book "Nomad", which is her personal story of plight from Africa to America and tortures of Islaam. She is conceding in one interview that ultimately it is a clash of civilisations ( as claimed by famous book of Huttington's "Clash of Civilisations") and for the sake of Muslims she pleads that Cristians should show a strong posture which in her opinion will help Islaam to reduce ill-treatment to women. She tells us that even in America the so called educated muslims force circumcision on their girls though they do not admitt it.

One reason Americans give for opposing the mosque near Ground Zero, is that it will appear more as a symbol of victory of Islaam's violent acts, than the tolerance of Americans. In this context it is interesting to note that there is a Museum at Los Angels in the name of Simon Wiesenthal on the subject of "Tolerance". If we look around we may find that these days tolerance is a thing to be found in musems alone. Govts in Europe have already boldly banned the veil for Muslim ladies as they think it liberates them to the level of the freedom of other ladies, which these govts. value more important than relegious identity.
America has a tradition of foregoing what is ethical and ideal for the immediate and practical. Presently they are bringing a proposition-23 in California, by which they want to go back on the committed environmental values till the present un-employment rate goes sufficiently down. Big companies are openly spending money to say no to this proposal lest industries flee out of the state.

This line of thought of Ayaan Hirsee Ali is interesting on the background of India's cronic problem of Hindu-Muslim relations. We had been given to accept very low levels of religiousness, thinking that this could be called as secularism of Hindus and will help Muslims also to reduce their strong religious fervour. But history tells us that it has not. Perhaps Muslims must be viewing it as weakness of Hindus. Hence it is worth a try to be more agressive for Hindus and perhaps demand the Ram Mandir. Seeing the way of the world's most secular society i.e, american society is behaving boldly towards Muslims it is worth trying for Indian Hindus to adopt a stronger stance in the context of Hindu-Muslim relations !

Arun Anant Bhalerao
arunbhalerao67@gmail.com