marathi blog vishva

रविवार, ४ एप्रिल, २०१०

निर्भीड-५
अमिताभ-सोनिया-काही घटना

सोनिया गांधी व राजीव गांधी यांचे प्रेम इटालीत जमले. तिथे राजीव गांधी विमान-चालकाचे प्रशिक्षण घेत होते. इंदिरा गांधींना भेटायला सोनियाजी पहिल्यांदा दिल्ली एअरपोर्टवर आल्या तेव्हा त्यांना घ्यायला खुद्द अमिताभ बच्चन गेले होते.
सोनियाजींच्या लग्नात नवरीला नटवणे तेजी बच्चनकडे होते. अमिताभचे जेव्हा चांगले बस्तान बसले तेव्हा त्याच्या पैशाचे व्यवहार त्याचा भाऊ अजिताभ बच्चन पाहू लागला. त्या काळी परदेशी चलनाचे नियम खूप काटेकोर होते. त्याला बगल देण्यासाटी अजिताभ व पत्नी रमोला एन आर आई झाले व लंडनला राहू लागले. अमिताभही त्या काळी युरोपात व परदेशी ठिकठिकाणी शोज करत असे.लंडनचा प्राप्तीकर चुकवण्यासाठी मग अजिताभ बहामाला राहू लागला.त्याने, हॉटेल, दुकाने व एक शिपिंग कंपनी काढली. ते सर्व नीट चालते तर तो ओनॅसिसची ( मिसेस केनेडीने नंतर ह्याच्याशी लग्न केले होते. ) तो बरोबरी करू शकला असता. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर राजीव पंतप्रधान झाल्यावर त्यांनी अमिताभला राजकारणात आणले. अमिताभ अलाहाबादहून दणदणित विजय मिळवून लोकसभेत बसला. तेंव्हाच्या अर्थमंत्र्यांनी, व्ही.पी.सिंग, फेरा कायद्याखाली बच्चन बंधूंवर कारवाई केली. राजीवचे न ऐकल्यामुळे व्ही.पी.सिंगाची संरक्षण मंत्री म्हणून बदली झाली. मग बोफोर्स प्रकरण लोकसभेत निघाले. अमिताभने लोकसभेतून पळ काढला. दोन वृत्तपत्रांनी बच्चन बंधूंनी बोफोर्स मध्ये राजीव ऐवजी पैसे घेतले असा आरोप केला होता.त्यांच्याविरुद्ध खटला ऊभारण्यासाठी राजीवजींनी सरकारचे लंडनस्थित वकील झरीवाला ह्यांना सांगितले. खटला चालू असताना सत्ताबदल होऊन व्ही.पी. पंतप्रधान झाले. त्यांनी झरीवालांना काढून टाकले. ते भारत सरकारचे सल्लागारही होते. त्यांचे खूप नुकसान झाले.राजीव गांधींनी मग एशिया ट्रस्ट मधून काही कोटी रुपये दिले. झरिवाला केस जिंकले पण अजिताभने त्यांची फीस दिली नाही व वर झरीवालांच्या पत्नीला फूस लावली, त्यांचा घटस्फोट झाला. अजिताभचाही घतस्फोट झाला. झरीवालांची नुस्ती फीसच त्याकाळी ७५ कोटी होती व ती त्यांना केस जिंकूनही मिळाली नाही. कालांतराने राजीवजींची हत्या झाली.
आता ह्या घटनांनंतर ओळखा अमिताभशी गांधी घराण्याचे वितुष्ट का आले व ते अजून का चालू आहे ?

अरूण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२

शनिवार, ३ एप्रिल, २०१०

निर्भीड : ४

सानिया-शोएब : स्लीपींग विथ द एनेमी

जॉर्ज बुश यांचे एक प्रसिद्ध वाक्य होते की तुम्ही एकतर आमच्या बरोबर आहात, नाही तर आमच्या विरुद्ध आहात . ( यू आर आयदर विथ अज ऑर अगेन्स्ट अज ) . आता पाकिस्तान हे काही आपण आपले मित्र-राष्ट्र म्हणू शकत नाही. म्हणजे बुश-नीती प्रमाणे ते आपले शत्रू-राष्ट्रच म्हणायला हवे. मग सानिया मिर्झा पाकीस्तानी कप्तान शोएब ह्याच्याशी लग्न करणार, म्हणजे "स्लीपींग विथ एनेमी" च झाले की. अर्थात् असे लग्न करणारी ती काही पहिलीच नाही.

बर्‍याच भारतीय लोकांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आहे, हे बर्‍याच पालकांना माहीत असेल. किंवा बरेच पालक कधी एकदा आपल्या मुला-मुलींना अमेरिकन नागरिकत्व मिळते असे झालेले असतात. पूर्वी अमेरिकन नागरिकत्वाची परीक्षा देताना व नंतर ती शपथ घेताना म्हणे असे म्हणावे लागे की भारताशी युद्ध झाले तर आम्ही अमेरिकेकडून आमच्या नातेवाईकांविरुद्ध लढू. कित्येक भारतीयांना ही शपथ घेताना अगदी रडू यायचे, पण इतर फायदे बघता सगळ्यांचा ओढा तिकडेच असायचा. आणि गंमत बघा आज वीस वर्षांनंतर ह्यांची मुले शाळेत भांडतात की तुम्ही आम्हाला भारतीय म्हणून कमी मार्क देता. म्हणजे मुले, आई-वडील कायद्याने अमेरिकन पण ते त्यांना लेखतात अजूनही भारतीय. अशीच काहीशी कोंडी सोनियाजींची झाली होती. राजीव गांधीमुळे त्या झाल्या भारतीय, पण त्यांच्यावर ठपका ठेवला गेला ईटालियन असण्याचा. त्यापायी बिचारीला पंतप्रधानपद सोडावे लागले. शरद पवारांनी ह्याच मुद्द्यावर वेगळी कॉन्ग्रेस काढली होती. नशीबाने राहूल वा प्रियांका ह्यांना लोक भारतीयच समजतात.

आता राहूल गांधी ह्यांनी समजा कोणा पाकिस्तानी मुलीशी ( उदा:बेनझीरच्या ) लग्न केले, ( अफवा अशी आहे की ते कोणा स्पॅनिश मुलीशी लग्न करणार आहेत.), तर सर्व प्रश्न आपल्याला चुटकीसरशी सोडवावे लागतील. म्हणजेच सोडून द्यावे लागतील. कारण मग "माहेरची साडी" चा प्रयोग होईल.

समजा सानिया मिर्झा डेव्हिस कप भारताकडून खेळली आणि शोएब पाकिस्तान कडून खेळला तर सामन्या आधी व नंतर आपल्याला आठवेल तोच जुना सिनेमा : स्लीपींग विथ द एनेमी !

अरुण अनंत भालेराव
भ्रमण: ९३२४६८२७९२

गुरुवार, १ एप्रिल, २०१०

निर्भीड :३
संगोपन किंवा मुले अशी का निघतात ?

हुशार आई-वडिलांच्या पोटी मूर्ख मुले येतात तेव्हा प्रश्न येतो की मुले अशी का निघतात ?
ज्युडिथ रिच हॅरिस ह्या विदुषीचे ह्याबाबत एक प्रसिद्ध पुस्तक आहे : नर्चर ऍझम्पशन्स ( संगोपनातली गृहिते ). काय आहेत ही गृहिते ?
हुशारी हि आई-वडिलांकडून जन्माने येते, चांगल्या संगोपनाने मुले चांगली निघतात, चांगल्या शिक्षणाने मुले चांगली निघतात. ह्या लेखिकेचे संशोधनाअंती मत आहे की असे काही असत नाही. तिच्या प्रयोगात असेही आढळले की चांगल्या शिक्षकांचाही मुलांवर काही परिणाम होत नाही. जे पालक जाणीव पूर्वक मुलांना पुस्तके वाचून दाखवितात त्यांचाही मुलांवर काही परिणाम होत नाही. हे निष्कर्ष इतके घाबरविणारे आहेत की सगळ्या पालकांनी खडबडून जागे होत हे पुस्तक वाचायला हवे.
मग मुलांवर परिणाम होतो तरी कोणाचा ? तर समवयस्कांचा किंवा पीयर्स चा. अगदी चांगले वळण लावलेले मूल शाळेत जाता जाताच दुसरे काही चांगले शिकण्या ऐवजी टगी पोरे असतात त्यांचे पाहून "च्यायला, वाट लागली, शट-अप," व ईतर शिव्या सारखे शब्द पटकन शिकतात. ज्वलंत स्वातंत्र्य सैनिकाच्या घरी त्याचीच मुले वाढदिवशी दारूची पार्टी जेव्हा मनवतात तेव्हा ते अध:पतन नसते तर तो काळाचा महिमा असतो. कारण आईटी च्या तरुणांना थोडा विरंगुळा म्हणून पार्टी करणे रास्त वाटते.मग ईतरेजनांवरही त्याचा परिणाम होतो. इथे संगोपनात काही त्रुटी राहून गेल्या अशी आई-वडिलांनी खंत करण्यापेक्षा कोणाचा कसा परिणाम होतो ह्याची शास्त्रीय माहीती घेणे ज्यास्त श्रेयस्कर ठरते. ह्या गोष्टी पटायला फारच क्रांतिकारक आहेत.
ह्या उलट असे लेखिकेला आढळले की ज्यांच्या घरात खूप पुस्तके आहेत, ती त्यांनी वाचून नाही दाखवली व मुलांनी ती नाही वाचली तरी मुलांवर खूप चांगला परिणाम होतो. हे अमेरिकेतल्या एका कौंटीला इतके पटले की त्यांनी ट्र्क्स भरभरून मुलांना पुस्तके वाटली.
रोजच्या संसारातही असेच काहीसे आढळते. सर्व सासवांना वाटत असते की माझा मुलगा माझ्या ऐकण्यातला आहे. पण सून येताच त्या समवयस्क मुलीचा त्याच्यावर इतका परिणाम होतो की तो सहजी वेगळा होतो. निदान सामाजिक कल तरी तसा आहे.

---अरूण अनंत भालेराव.
भ्र: ९३२४६८२७९२

बुधवार, ३१ मार्च, २०१०

दुतोंड़ी चिदंबरम

निर्भीड : २
दुतोंड़ी चिदंबरम

चिदंबरम ह्यानी ग्रह खाते घेतले तेंव्हा त्यांचा भर होता पारदर्शकते कड़े । मध्यंतरी त्यानी मुंबई दहशत विरोधी पोलीस दलाला काही माहीती दिली व त्या बरहुकूम के पी रघुवंशी ह्यानी कारवाई केली । इतके करूनही रघुवंशी ह्यांची उचल बांगडी झाली । कारण काय तर त्यानी प्रामाणिक पणे जी माहीती मिळाली होती ती मिडीयाला दिली । झाले साहेबांचे पित्त खवलले। स्वतःची छबी प्रामाणिक पणाची, पण इतरानी तसे न करता माझ्या सांगण्या बाहेर जायचे नाही । लोकशाही प्रणालीत वरिष्ठानी तत्वे घालून द्यायची असतात व मग ती खाल्च्यानी पालाय्ची असतात। पण लोकशाही हवीय कोणाला ?

अरुण भालेराव
९३२४६८२७९२

सोमवार, २९ मार्च, २०१०

अमिताभ आणि सोनिया

निर्भीड
अमिताभ आणि गांधी
अमिताभ कोणाला आवडत नसावा ? सोनियाजींना का राहूलला का प्रियांकाला ? एकेकाळी राजीव गांधींशी इतके मेतकूट की मुलांना घेऊन स्वित्ज़र्लंड मध्ये अमिताभ आणि त्याच्या मोठया भावाने बिर्‍हाड बसवले होते. म्हणजे आत्ताचा खुन्नस सोनियाजींचाच असणार.
का बरे असावा हा राग ? राजकारणात खरे कारण नेहमी पैसाच असते. कारण आजकाल सर्व जण राजकारण पैसे मिळविण्यासाठीच करतात ना ! आणि म्हणूनच राजकारणात नेहमी वारस म्हणून घरचाच माणूस असावा लागतो. अमिताभ सारखी गत पूर्वी कोणाची झालीय ते आठवून पहा. नटवर सिंह हे इंदिरांजींपासून खास मर्जीतले. पैशाचे सर्व व्यवहार सांभाळणारे. आणि इराक मध्ये त्यांनी परस्पर डल्ला मारला, पैसे पोचते केले नाही म्हणून त्यांचे मंत्रीपद तर गेलेच नि आता नसत्या केसेस मागे लागल्या आहेत.
तर पैसा कोणी सोडत नाही. आता सोनियाजींकडे थोडे का पैसे असतील ? पण पैशाबाबत नियम असा की जितके ज्याच्याकडे पैसे ज्यास्त तितका तो पैशाबाबत कडक. कारण पैशाची खरी किंमत गडगंज पैसेवाल्यालाच. निष्कांचनाला पैशाचे काय होय ?
तर ह्या हिशोबाने अमिताभचा राग करण्यामागे खरे कारण असणार पैसा ! बोफोर्सचा आणि इतर ठेवायला दिलेला. तो ह्याने एकतर परत केला नसणार किंवा हिशोबात गफलत असणार. बरे आता अमिताभने देतो म्हटले तरी घेण्याची जोखीम राहतेच. म्हणून परत राग ! समाजवादी पक्षाला जवळ केले, अमरसिंहांना मित्र केले, मोदींशी संबंध ठेवले वगैरे सर्व कारणे वरवरची. खरे कारण असणार बक्कळ पैसा ! आणि तोच जर भरवशाच्या माणसाने दिला नाही तर तोफेच्या तोंडीच द्यावे लागणार त्याला . हाच न्याय, हेच खरे सत्य !