marathi blog vishva

गुरुवार, १६ डिसेंबर, २०१०

निर्भीड व्हा-----१९
दबाव केव्हा येतो ?
दिग्विजय सिंगांचे "करकरे दबावाखाली होते" ह्या म्हणण्यासाठी हटून राहणे, काही तरी वेगळेच सुचवणारे आहे. समजा करकरे मालेगाव स्फोटानिमित्ताने दबावाखाली असतील तर असला दबाव केव्हा व कसा येतो ?
कोणाही मानसोपचारतज्ज्ञाला विचारा, आपल्या मनाविरुद्ध काम करावे लागले तर दबाव येतो असे म्हणतात. नोकरी धंद्यात आपण पाहतो की "जॉब सॅटिसफॅक्शन" हे त्यामुळेच महत्वाचे ठरते. जर रक्त पाहून कोणी बेशुद्ध पडत असेल, व त्याला आईवडिलांनी बळजबरीने डॉक्टरकीला टाकले असेल तर त्याला दबाव येतो. पंतप्रधान झालो तर आपले इटालियनपण सारखे त्रास देणार ह्या दबावापायीच सोनियांना "आतल्या आवाजाला" ओ द्यावी लागली. आता जर आणखी सांगाडे बाहेर आले तर आपली काही खैर नाही ह्या दबावापायीच तर जेपीसी नको आहे. एखाद्या पत्रकाराला कितीही जनमताच्या विरोधी लिहायचे धारिष्टय असते, पण आपण कोणाच्या दबावाखाली आपल्या मनाविरुद्ध काही लिहिले आहे, त्याचा त्याला ज्यास्त दबाव येतो. वीर संघवी व बरखा दत्तला विचारा . आपली जी धारणा असते त्याविरुद्ध वरिष्ठांनी काम करायला सांगितले तर त्याचा दबाव येतो. पोलिसाला जर निरपराध्यावर गोळ्या चालवा असे सांगितले तर तसे करताना त्याचे हात थरथरतात. दबाव येतो. दाऊदची टोळी एरव्ही इतक्या धमक्या देते त्याचे एखाद्याला काही वाटत नाही, पण आपण जर दाऊदच्या शूटरला कधी सोडले असेल तर ते उघडकीला येण्याचे दडपण येते. त्याला सोडताना दबाव येतो. एवढे कशाला, खोटे बोलणे शोधणारे जे मशीन आहे त्याचे सूत्रच आहे की मनाविरुद्ध खोटे बोलणार्‍याचे शरीरच मशीनद्वारे खुणा करते, दबाव दाखवते.
आता दिग्विजय सिंगांकडे फोनचे तपशील नाहीत, गृहमंत्रीसुद्धा तसा फोन झाला नव्हता म्हणतात तरी करकरेंवर दबाव असलाच तर तो वरिष्ठांच्या त्यांच्यामागे लावलेल्या मालेगाव स्फोटात हिंदू आतंकवाद्यांना कसेही करून पकडा ह्या दबावाचेच असणार आहे. एरव्ही रोज गुन्हेगारांना पकडणार्‍याला त्यांच्या धमक्यांचे काय हो ? दबाव असलाच तर तो मनाविरुद्ध कोणाला पकडावे लागले त्याचाच असणार आहे ! दिग्विजय सिंगाच्या सातत्यामुळे हे लक्षात तरी आले. कित्येकवेळा शाहण्यांच्या शोधातून सापडत नाही ते कोणाच्या बरळाने सहजी लख्ख दिसून जाते, ते असे !
अरुण अनंत भालेराव
arunbhalerao67@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा